शिर्डी, 05 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचं मंथन शिबीर शिर्डीमध्ये पार पडलं. तब्येत ठीक नसताना सुद्धा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे हॉस्पिटलमधून शिर्डीमध्ये या शिबिरासाठी दाखल झाले. मात्र, राष्ट्रवादीचे फायरब्रँड खासदार अमोल कोल्हे यांच्यापाठोपाठ अजित पवार सुद्धा या शिबिराला गैरहजर होते. शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं मंथन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला सर्व प्रमुख नेते आणि खासदार हजर आहे. मात्र, या कार्यक्रमाला अजित पवार आले नाही. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. जयंत पाटील यांचं भाषण झालं. पण, अजित पवार हे या शिबिराला गैरहजर होते. अजित पवार हे आजोळी गेले असल्यामुळे शिबिराला येऊ शकले नाही, असं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, या शिबिरात पक्षाचे फायर ब्रँड नेते खासदार अमोल कोल्हेंची मंथन शिबिराकडे पाठ फिरवली आहे. हिंदुत्व आणि शिवाजी महाराजांची कार्यपद्धती विषयावर मांडणी अमोल कोल्हे बोलणार होते. पण अमोल कोल्हे या कार्यक्रमाला गैरहजर आहे. पक्षातील कार्यपद्धतीवर कोल्हे नाराज असल्याची सूत्रांची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. कोल्हे यांच्या अनुपस्थिती बाबत पक्षातील नेत्यांनी मात्र मौन बाळगलं आहे. विशेष म्हणजे, आज शिबिराचा शेवटचा दिवस आहे, पण शेवटच्या दिवशीही कोल्हे आले नाही. याआधीही कोल्हे यांनी पक्षाविरोधात भूमिका घेतल्यामुळे वाद निर्माण झाला होता. (नवाब मलिकांना धक्का, साम्राज्याला लागणार टाळे, ईडी जप्त करणार मालमत्ता) दरम्यान, या शिबिरात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणातून भाजप आणि शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भोंगे बंद करण्याचा निर्णय घेताना विचार केला नाही. त्याचा परीणाम काय होणार..? गेले मशिदीवरचे भोंगे बंद करायला आणि साईबाबांच्या मंदिरावरचा भोंगा बंद झाला, असं म्हणत सुळे यांनी मनसेला टोला लगावला. गेल्या वर्षभरात पन्नास हजार कोटी रूपये स्वच्छ भारत अभियानासाठी घालवले. स्मार्ट सिटी आणि अमृत सिटी योजनेत लाखो कोटीचा खर्च केले. मात्र त्याचा काय परीणाम झाला हे दिसत नाही. त्याचं ऑडिट कोण करणार आहे ? चौवीस तास चॅनल चालवायचा आपण काय मक्ता घेतलाय का? का आपण उत्तर द्यायचं. राजकारण आणि मीडियाचं नाते आहेच. ते संबध चांगले ठेवावे लागतात. मात्र त्यांनी आपल्यावर टीका करायलाच हवी. मीडिया आणि राजकारण याचा संबंध असावा मात्र त्यात प्रलोभन आणि धाक नसावा. पन्नास खोके घेतल्याचं कोणीही म्हणत नाही घेतले नाही म्हणून, गावागावात गेल्यावर लोक त्यांना विचारत आहेत. मात्र ते त्यावर काहीही बोलत नाही. गिफ्ट घेऊन विरोधात बातम्या छापत नसल्याचा आरोपच सुळे यांनी केला. ( सत्तार हा हिरवा साप त्याला आम्ही ठेचणार, ठाकरे गटाच्या नेत्याकडून जहरी टीका ) विरोधात बसायला का घाबरता. अनेक वर्षे सत्तेत होतो त्यामुळे तुम्हाला वाटत असेल सत्ता असेल तरच काम होतात. जितके लोक बारामतीत येतील त्यांचे स्वागतच आहे. पण दिल्लीत बसून काय तारे तोडताहेत, असं म्हणत भाजपच्या मिशन बारामतीवर सुप्रिया सुळे यांनी टीका केली.