विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई 18 नोव्हेंबर : श्रध्दा वालकर हिंदू होती म्हणून तुम्ही बोलत नाही की, आफताब मुस्लीम होता म्हणून? तुमचे आफताबला मूक समर्थन आहे का? असा थेट सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला विचारत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केला. जागर मुंबईचा यातील सहावी सभा आज बोरिवली येथे झाली. यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी हा सवाल केला.
‘…तर उद्धव ठाकरेंनी चुल्लू भर पाण्यात डुबून…’, आता रवी राणांचं वादग्रस्त विधान यावेळी मुख्य वक्ते म्हणून बोलताना आशिष शेलार म्हणाले की, ज्या घरामध्ये तरुण मुलगी आहे ते घर आज अस्वस्थ आहे. आफताब नावाचा नराधम तिचे ३५ तुकडे करतो. तो तिचे धड कापून फ्रीजमध्ये ठेवतो. अशी दुर्भाग्य श्रद्धा वालकर तुमच्या आमच्यात होवून नये. आम्हाला त्यावर राजकारण करायचे नाही पण सवाल हा आहे की, मृत्युमुखी श्रद्धा झाली पण मारणारा आफताब होता? हाच प्रश्न मानवतावादी दृष्टिकोनातून उभा करणारे शबाना आझमी, मेधा पाटकर, जावेद अख्तर, शरद पवार, राहुल गांधी, मेधा पाटकर यांची बोबडी बंद पडली आहे. हा लव्ह जिहाद आहे. शेलार पुढे म्हणाले, की मुस्लीम मुलं हिंदू मराठी मुलींना पळवून नेवून असे नराधम कृत्य करतात. आमचा सवाल आदित्य ठाकरे यांना आहे. तुम्ही याचा निषेध का नाही केला? का आंदोलन केले नाही? श्रद्धा हिंदू आहे म्हणून की आफताब मुसलमान आहे म्हणून? असं होवू नये पण दुर्दैवाने कुठल्या मुस्लीम मुलीचा खून झाला असता तर या देशातील सगळे गळे काढत उभे राहिले असते. हिंदू आणि मराठी मुलीचा खून झाल्यानंतर उद्धव ठाकरे निषेधाचा सूर काढत नाहीत कारण त्यांना मुस्लीम मताची गरज आहे. आफताबला फाशी झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. मुस्लीम मतासाठी शिवसेनेने मौन बाळगले आहे. उद्याची परिस्थिती तुमच्यावर येऊ नये यासाठी हा जागर करतो आहोत. सावरकरांबद्दलच्या वक्तव्याने वाद, राहुल गांधींविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल शेलार म्हणाले, जे ओवेसींला जमले नाही ते उद्धव ठाकरे यांनी करून दाखविले. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनचं थडगे यांनी सुरक्षित केले. दाऊदशी संबंध असणारे नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज्याकडे पुरावे मागितले जातात. औरंगजेबाचे स्वप्न उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केले. प्रत्येक वार्डात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून मराठी आणि मुस्लीम मताचं गणित जुळवलं जात आहे. सलग २५ वर्ष राज्य करून तुम्हाला जाती धर्माच्या आधारावर मतं मागण्याची वेळ का आली? केलेल्या कामाच्या आधारावर मतं मागा. सांगा तुम्ही किती प्रकल्प केले, रस्ते बांधले, किती शाळा बांधल्या? यातील काहीही त्यांना सांगता येत नाही. मुंबई महापालिकेची सत्ता हातातून जात असल्याने शेवटचा डाव हा रडीचा म्हणजेच कलीचा डाव खेळला जात आहे, असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला.