मुंबई, 26 ऑक्टोबर : राज्यातील सत्तासंघर्षानंतर ठाकरे गट आणि भाजपमध्ये मोठी दरी पडली यामध्ये शिवसेनेचे 40 आमदार फोडल्याने ठाकरे गटाकडून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारवर खरमरीत शब्दात टीकास्त्र सोडलं. हे सरकार अजून राजकारणातच अडकलं आहे. घटनाबाह्य सरकारने कामही करायची असतात, हे त्यांना अजून जाणवले नाही. राज्यात केवळ आश्वासनांवर आश्वासने आणि घोषणांवर घोषणा देणे सुरू असल्याचे सांगत्या त्यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्रातील सरकार घटनाबाह्य सरकार असून ते काम करायचे विसरले आहेत. ते केवळ घोषणा आणि आश्वासने देतात, मात्र अंमलबजावणी केली जात नाही. या सरकारला आता शरम उरली नाही, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला.हे सरकार अजून राजकारणातच अडकलं आहे. घटनाबाह्य सरकारने कामही करायचं असतं, हे त्यांना अजून जाणवलं नाही.
हे ही वाचा : शिवसेना, भाजप आणि मनसे महायुती होणार का? मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात दिलं उत्तर
राज्यात केवळ आश्वासनांवर आश्वासने आणि घोषणांवर घोषणा देणं सुरू आहेत. पण जनतेचा आवाज कुठेही ऐकला जात नाही. त्यामुळे या सरकारला ‘घोषणा सरकार’, ‘खोके सरकार’ अशी अनेक नावे मिळाली आहेत. आपण काम करणे गरजेचे आहे, हेही ते विसरून गेले आहेत. असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी दिली.
राज्यातील प्रत्येक बस स्थानकावर शिंदे सरकारचे होर्डिंग्स लागले आहेत. या होर्डिंगसाठी पैसे दिले आहेत की नाही? हे अजूनही माहीत नाही. दिले असतील तर कुणी दिले? आणि दिले नसतील तर याची नुकसानभरपाई कोण करणार? हेही माहीत नाही. शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर बॅनर लावले आहेत. पण महापालिकेकडून कुठेही कारवाई केली जात नाही. एवढे सगळे राजकीय होर्डिंग्स बघून मला मळमळायला लागलं असल्याचे ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा : ‘भोंगा सहन करतोय ना, मग…’ ‘त्या’ ट्वीटवरून मनसे नेत्याची थेट धमकी
खरं तर, सणासुदीपासून राजकारण बाजुला ठेवलं पाहिजे. पण सर्वत्र उधळपट्टी सुरू आहे. त्यांनी महागाईवर, रुपयाच्या पडत्या किमतीवर, शेतकऱ्यांच्या नुकसानीवर, बेरोजगारीवर बोलायला हवं. पण प्रश्नांवर कुणीही बोलायला तयार नाही. केवळ उधळपट्टी सुरू आहे. निव्वळ घोषणा दिल्या जात आहेत. दहिहंडीच्या काळातही एवढ्या घोषणा दिल्या, मात्र त्यातील एकही घोषणा अंमलात आणली नाही. फक्त खोटं बोलत राहायचं, हेच सरकारचं धोरण आहे, अशी खोचक टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.