मुंबई, 15 डिसेंबर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ठाकरे कुटुंबाच्या नावे रायगड जिल्ह्यातल्या कोर्लेईत असलेल्या कथित बंगल्याचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत किरीट सोमय्या या प्रकरणी याचा पाठपुरावा करत होते. पण आता या प्रकरणात ग्रामविकास खात्याची एंट्री झालीय. ग्रामविकास खात्यानं कोर्लेईतल्या बंगल्यांची चौकशी सुरु केलीय. दोन दिवस या प्रकरणाचा चौकशी अहवालही मागवलाय. आणि मुख्य म्हणजे अवघ्या चार दिवसांवर विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आहे, त्यामुळे अधिवेशनात सत्ताधारी या बंगल्यांचा मुद्दा उपस्थित करुन विधिमंडळ अधिवेशन गाजवण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या परिवाराचे रायगडमध्ये 19 बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय. या प्रकरणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी 48 तासात या प्रकरणी चौकशी अहवाल पूर्ण करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सोमय्यांनी दिली आहे.
#UddhavThackeray Family 19 Bunglows Ghotala, Minister @girishdmahajan asked Raigad Jilla Parishad to give findings/report in 3 day
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 15, 2022
उद्धव ठाकरे परिवार "19 बंगलो घोटाळा" मंत्री गिरीश महाजननी रायगड जिल्हा परिषदेला 3 दिवसात अहवाल देण्याचे आदेश दिले@mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/jvc9mc0Tpi
In 2014, Thackeray and the Waikar family bought the bungalows from Anvay Naik in their own names.
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 12, 2022
Thackeray's paid 19 Bungalows House Property Taxes for 8 years i.e. 1/4/2013 to 31/3/2021
We exposed this scam on 11 November 2020
Then the Thackeray government CMO pressurized Alibag, Raigad District Authorities to Remove 19 Bungalows from Records
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 12, 2022
We want investigation of 19 Bungalows Scam
Today at 12 noon I will meet the CEO at Alibaug @BJP4India@mieknathshinde @Dev_Fadnavis
काय आहेत आरोप? मुरुडच्या कोलई गावातील 19 बंगले ठाकरे कुटुंबाकडून अन्वय नाईकांकडून खरेदी केले. या बंगल्यांचा 2014 ते 2019 पर्यंतचा प्रॉपर्टी टॅक्सही भरला. 2021 मध्ये सर्व रेकॉर्ड्स गायब केल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.