रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून याबाबतची माहिती जारी करण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या पाच जिल्ह्यांसाठी 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यात 8 जुलैसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी 9 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (ठाण्यात खड्ड्याने घेतला पहिला बळी, दुचाकी खड्ड्यात, तरुण जमिनीवर, मागून एसटी, भयानक दुर्घटना) हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या पाच दिवसांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे धुळे, नंदूरबार जिल्ह्यात येल्लो आणि ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान कोल्हापुरात संभाव्य परिस्थिती पाहता NDRF च्या दोन टीम जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. संभाव्य धोका लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती समोर येत आहे.पुढचे ४,५ दिवस राज्यात सर्वदूर पसरलेल्या पावसाची शक्यता. 🌧🌧 📢 कोकण, मध्य महाराष्ट्र व इतर काही भागात अती मुसळधार पावसाचे इशारे. 🌊🌊कोकणात पूर परिस्थिती अनेक ठिकाणी... https://t.co/kxlIAKcXa7
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 5, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai rain, Rain updates