जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिंदे-फडणवीसांचा निर्णय चुकीचा, खडसेंनी भाजपमधलाच अनुभव जाहीरपणे सांगितला

शिंदे-फडणवीसांचा निर्णय चुकीचा, खडसेंनी भाजपमधलाच अनुभव जाहीरपणे सांगितला

 'हा निर्णय काही योग्य नाही. मी अनुभवलेला आहे. लोकांमधून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडून घेणे हे चुकीचे आहे.

'हा निर्णय काही योग्य नाही. मी अनुभवलेला आहे. लोकांमधून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडून घेणे हे चुकीचे आहे.

‘हा निर्णय काही योग्य नाही. मी अनुभवलेला आहे. लोकांमधून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडून घेणे हे चुकीचे आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

इम्तियाज अली, प्रतिनिधी जळगाव, 17 जुलै : राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मागील सरकारने घेतलेल्या निर्णय स्थगिती करण्याचा धडाका लावला आहे. सरपंच आणि नगराध्यक्षांची निवडीचा निर्णय फडणवीस यांनी रद्द केला आहे. पण, लोकांमधून सरपंच निवडणे हे अत्यंच चुकीचे आहे. भाजपमध्ये असतानाच आम्ही या अडचणीला सामोरं गेलो होतो, असा खुलासाच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीने घेतलेला सरपंच आणि नगराध्यक्ष लोकांमधून न निवडण्याचा निर्णय रद्द केला आहे. या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये असताना या निर्णयाचा कसा परिणाम झाला, हे जाहीरपणे बोलून दाखवलं आहे. ‘हा निर्णय काही योग्य नाही. मी अनुभवलेला आहे. लोकांमधून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडून घेणे हे चुकीचे आहे. याआधीही मी भाजपमध्ये असताना नगराध्यक्ष निवडणुकीत आमचा उमेदवार निवडून आणला होता. अगदी 2020 साली जळगाव महापालिकेमध्ये भाजपचा लोकनियुक्त सरपंच आम्ही निवडून आणला होता. त्यावेळी पाच वर्ष हा काय काळ होता तो विचित्र गेला होता. त्यावेळी इतर सदस्य हे वेगळा निर्णय घ्यायचे आणि नगराध्यक्ष हा वेगळा निर्णय घ्यायचा. नगराध्यक्ष वेगळा निर्णय घ्यायचा तर त्याला सदस्य विरोध करायचे, असं खडसेंनी साांगितलं. ( मी लिहून देतो की.., शिवसैनिकांकडून स्टॅम्प पेपरवर भरून घेतले प्रतिज्ञापत्र ) ‘मुक्ताईनगरमध्ये आमच्या पक्षाचा नगराध्यक्ष होता, तोपर्यंत सगळं काही ठीक होतं. पण पक्ष बदलला आणि काही लोक दुसऱ्या पक्षात गेले. त्यामुळे आमची काही लोक आणि विरोधक अशी भूमिका झाली. त्यामुळे प्रशासनात निर्णय घेण्यास अडचणी निर्माण झाल्यात, असंही एकनाथ खडसे यांनी सांगितलं. ( आधार कार्डवर किती सिम घेता येतात? अनधिकृत Sim कशी बंद करावी? फॉलो करा प्रोसेस ) सरपंच निवडणूकही अशी झाली तर सदस्य आणि त्यांच्यात वाद निर्माण होतो. सरपंच हा काहीच कामाचा नसतो. त्याला कोणतेही अधिकारी राहत नाही. त्यामुळे हा निर्णय घेणे चुकीचे आहे. एकतर नगराध्यक्षाला आणि सरपंचाला अधिकार दिले पाहिजे. काही विशेष अधिकार असले तरच तो काम करू शकतो. पण अधिकारच नसले तर बहुमतावरच त्याला अवलंबवून राहावे लागते, यामुळे विचित्र परिस्थिती निर्माण होते. यापेक्षा पूर्वीची जी पद्धत होती, ती योग्य होती, असंही खडसेंनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात