आशिष शेलार यांचा पलटवार... बात 'हरामखोरीची' निघाली तर मग 'डांबरानं' लिहिलं जाईल, असं मुंबईकरांना बरेच आठवेल!, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी शिवसेनावर पलटवार केला आहे. 106 हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना? मुंबाई मातेचा अपमान कोण करतेय? असा सवालही ट्विटरच्या माध्यमातून आशिष शेलारांनी यावेळी विचारला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र महाराष्ट्रात मुघलाई अवतरल्याचे चित्र पहायला मिळतयं. सत्ताधार्याच्या विरोधात बोलाल तर बंगल्यावर नेऊन मारू सत्ताधार्यांच्या विरोधात बोलाल तर खोट्या केसेस करू आणि सत्ताधार्या सोबत नसाल तर घर ही तोडू. #संविधानबचाओ
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 9, 2020
आणखी काय म्हणाले आशिष शेलार? बेईमानी नेमकी कोण करतेय? हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना? ऐवढे तपासून पाहा! मुंबई साखळी बॉम्ब स्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, ऑफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवलीत होती का? पण रस्त्यावरच्या खड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलिष्काच्या घरात आणि कंगना रणौतच्या घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना? या जुन्या गोष्टीची आठवण करून देत आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोलाही लगावला आहे. फडणवीसांवर शिवसेनेची खोचक टीका... पावसाळी अधिवेशनात भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत आणि कंगना रानावत प्रकरणावरून शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. या टीकेला आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे. 'शिवसेनेने वेगळी वाट निवडली असली तरी ‘पंतप्रधान’ म्हणून मोदींचा अवमान कदापि सहन करणार नाही. मोदी हे आज एक व्यक्ती नसून पंतप्रधान म्हणून ‘संस्था’ आहे. महाराष्ट्रातील बेइमानांच्या पाठीशी जे उभे राहात आहेत, त्यांना 106 हुतात्म्यांचे तळतळाट लागतीलच, पण राज्याची 11 कोटी जनताही माफ करणार नाही. ‘मुंबाई’ मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. बेइमान लेकाचे! या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये' अशा शब्दात शिवसेनेनं फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. हेही वाचा...बात 'हरामखोरीची' निघाली तर...'सामना'तील अग्रलेखावरून आशिष शेलारांचा पलटवार 'मुंबईत इमानाने राहणाऱ्या सर्वांची आहे. मुंबईची तुलना ‘पाकव्याप्त’ कश्मीरशी करणे व मुंबई पोलिसांना माफिया वगैरे हिणवून खाकी वर्दीचा अवमान करणे हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. महाराष्ट्रातील 11 कोटी मऱ्हाटी जनतेस तर हा असा मुंबईचा अवमान म्हणजे देशद्रोहासारखा गुन्हा वाटतो, पण असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीच्या मागे राष्ट्रभक्त मोदी सरकारचे गृहमंत्रालय सुरक्षा कवच घेऊन ठामपणे उभे राहते तेव्हा आपले 106 हुतात्मेही स्वर्गात अश्रू ढाळत असतील' असं परखड मत सेनेनं व्यक्त केले.बात “हरामखोरीची”निघाली तर मग "डांबराने" लिहीले जाईल असे मुंबईकरांना बरेच आठवेल! 106 हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना? मुंबाई मातेचा अपमान कोण करतेय? बेईमानी नेमकी कोण करतेय? हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना? ऐवढे तपासून पहा! 1/4
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 9, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Kangana ranaut, Mumbai police, Shiv sena