मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /''मग काय औरंगजेबचा पुतळा उभारायचा का?'', महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावरून शिवसेनेचा संतप्त सवाल

''मग काय औरंगजेबचा पुतळा उभारायचा का?'', महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावरून शिवसेनेचा संतप्त सवाल

औरंगाबाद (Aurangabad) शहरात महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावरून राजकारण पेटले आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ( mim mp imtiaz jaleel ) यांनी विरोध केल्यामुळे शिवसेना (Shivsena) आणि भाजपने (BJP) जोरदार आक्षेप घेतला आहे.

जालना, 23 जानेवारी: औरंगाबाद (Aurangabad) शहरात महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावरून राजकारण पेटले आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ( mim mp imtiaz jaleel ) यांनी विरोध केल्यामुळे शिवसेना (Shivsena) आणि भाजपने (BJP) जोरदार आक्षेप घेतला आहे. यावरुन शिवसेनेनं इम्तियाज जलील यांना संतप्त सवाल उपस्थित केला आहे. मग काय औरंगजेबचा पुतळा उभारायचा का, असा सवाल शिवसेनेनं जलील यांना विचारला आहे.

शिवसेनेचा संतप्त सवाल

औरंगाबादमध्ये महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यास एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केलाय. महाराणा प्रताप यांचा नाही तर मग काय औरंगजेबचा पुतळा उभारायचा का असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी सवाल विचारला आहे. त्या जालन्यात बोलत होत्या.

महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला जलील यांचा विरोध

'पुतळ्याचे एक कोटी ग्रामीण भागात सैनिकी शाळा उभारण्यास करा, पण फक्त पुतळा उभारायचे असेल तर माझा ठाम विरोध आहे, असं जलील यांनी स्पष्ट केलं आहे. इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पत्र लिहिले आहे. यात त्यांनी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध केला आहे. जलील यांच्या भूमिकेला शिवसेनेचा विरोध केला आहे. आमदार अंबादास दानवे यांनी जलील यांच्या मताला विरोध केला आहे.

'महाराणा प्रताप हे थोर, महान शूरवीर होते. त्यांच्याबद्दल कुणीही प्रश्न उपस्थितीत करू शकत नाही. पण मी एक सल्ला दिला की महाराणा प्रताप यांच्या नावाने एक सैनिकी शाळा सुरू करूया. या शाळेचं नाव महाराणा प्रताप ठेवावे. ग्रामीण भागातील इच्छूक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहे. त्यांना याचा लाभ होईल. त्यांच्यासाठी खूप उपयोगी ठरेल' असा सल्ला दिला असल्याचं जलील यांनी सांगितलं.

Omicron च्या BA.2 स्ट्रेनमुळे शास्त्रज्ञांमध्ये दहशत; भारतासह 40 देशांना इशारा

 तसंच, 'मी पुतळ्याला विरोध करत नाही. पुतळा बनवायचा असेल तर आपण वर्गणी गोळा करू, मी सुद्धा वर्गणी देण्यासाठी तयार आहे. पण एक कोटी रुपयांमध्ये ग्रामीण भागात एक चांगली शाळा उभारू शकतो. त्याचा अनेक लोकांना फायदा होईल. पण मी म्हटल्यावर काहीहींना काही राजकारण आणायचे, भाजप आणि शिवसेनेला आपण खूप मोठे हिंदुत्वावादी आहोत हे दाखवताय. मी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध करत नाही आणि करणारही नाही. पण भाजप-सेनेचे लोक राजकारण मध्ये आणत आहे' अशी टीका जलील यांनी सेना आणि भाजपवर केली.

'कोणत्या पुतळ्याला बघून तुम्ही कोणती प्रेरणा घेतली, कमीत कमी शाळेमध्ये गेला असता तर काही शिकवण घेतली असती तर काही तरी ज्ञान मिळाले असते. फक्त पुतळे उभारायचे असेल तर त्याला माझा विरोध आहे तो कायम राहिल, असंही जलील यांनी ठामपणे सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Aurangabad News, Shivsena