छत्रपती संभाजीनगर, 12 मार्च, अविनाश कानडजे : जिल्ह्यात वाढत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या आठवडाभरात सहा शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. विशेष म्हणजे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा हा जिल्हा आहे. कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकरी आत्महत्या होत असल्यानं छत्रपती संभाजीनगर सध्या चर्चेत आलं आहे. दरम्यान शेतकरी आत्महत्येवर अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया देताना शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, शेतकरी अनेक वर्षांपासून आत्महत्या करतात असं वक्तव्य केलं आहे. यावरून आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
नेमकं काय म्हणाले सत्तार?
मी आज सोयगावला जाऊन पाहणी केली. प्राथमिक नुकसानभरपाई 13 हजार आली होती. आता हा आकडा 37 हजार इतका आहे. परंतु हा अंतिम अहवाल अद्याप सरकारकडे पाठवण्यात आलेला नाही. मी माझ्या मतदार संघात फिरून आलो, शेतीचे फार नुकसान झालेले नाही. शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, शेतकरी अनेक वर्षांपासून आत्महत्या करतात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली टीम बनवण्यात आली असल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे.
ठरलं! या मतदारसंघातून आठवले लढवणार निवडणूक; म्हणाले भाजपनं...
विरोधकांकडून टीका
कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकरी आत्महत्या करत आहेत. गेल्या आठवडाभरात सहा शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच आता शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, शेतकरी अनेक वर्षांपासून आत्महत्या करतात, असं वक्तव्य कृषीमंत्र्यांनी केल्यानं आता विरोधक त्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.