मुंबई 4 नोव्हेंबर : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु झाली आहे. त्यांनी आपले वडील राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करुन भारत जोडो यात्रेची सुरुवात 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथुन केली. ते कन्याकुारी ते कश्मिर असा चालत प्रवास करणार आहे. यामागे तरुणांना चालण्यासाठी तसेच आरोग्यासाठी प्रेरीत करणं आणि जागृकता निर्माण करणं हा त्यामागचा एक होतू आहे. त्यांच्या या यात्रेला युवकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. सोबतच मोठ सेलिब्रिटी देखील या यात्रेत सहभागी झाले आहेत. यामध्ये फिल्म मेकर पुजा भट्ट देखील जोडले गेले आहेत. तसेच या यात्रेत रोहित वेमुलाची आई आणि स्वर्गीय जर्नलीस्ट गौरी लंकेश यांच्या कुटुंबाचा देखील समावेश आहे. राहुल गांधी यांच्या या यात्रेला विदेशातून देखील सपोर्ट केला जात आहे. तर काही लोकांकडून या रॅलीला विरोध देखील होत आहे. हे ही वाचा : खेळाडूंच्या हृदयाचे ठोके असतात सामान्य लोकांपेक्षा कमी, पाहा त्यामागचे कारण या सगळ्या पॉलिटीकल गोष्टींकडे लक्ष न देता. यामधील खऱ्या मुद्याकडे आपण वळूयात की, राहूल गांधी आतापर्यंत जवळजवळ 12 हजार किलोमीटर चालले आहे. त्यांचे रॅलीमधील अनेक व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये ते धावताना, उड्या मारताना, डान्स करताना आणि स्वत:ला चाबूक मारताना देखील दिसले. पण विचार करा की एवढं जर तुम्ही चाललात किंवा एखादी व्यक्ती चालली तर शरीरावर त्याचा काय परिणाम होतो? किंवा तुम्ही यामुळे बारीक होऊ शकता का? सध्याच्या बिझी शेड्यूलमध्ये लोकांना आपल्या शरीराला द्यायला वेळ मिळत नाही, ज्यामुळे लठ्ठपणाच्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे चालणे हे शरीरासाठी खरंच खूपच चांगला पर्याय असल्याचं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. तज्ज्ञांचं मते आठवड्यातून 5 दिवस 10 किमी चालण्याने दर आठवड्याला 2 हजार 100 ते 3 हजार 600 कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे तुमच्या खाण्याच्या सवयी तशीच ठेवली, तर तुम्ही दर आठवड्याला ⅔ पौंड (०.३ किलो) ते १ पौंड (०.४५ किलो) चरबी कमी होण्याची अपेक्षा करू शकता. चालण्याचे फायदे काय? चालण्यामुळे खरंतर रक्तप्रवाहाला चालना मिळते, तसेच वेगाने चालणे तुमच्या हृदयाचे आणि फुफ्फुसांचे आरोग्य देखील सुधारू शकते. चालण्यामुळे अनेक आरोग्य विषयी समस्यांचा धोका कमी होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचे वजन नियंत्रीत करण्यात मदत होते. याव्यतिरिक्त, वेगाने चालणे तुमच्या मेंदूचे कार्य सुधारू शकते, तुमची ऊर्जा वाढवू शकते, तणाव कमी करू शकते आणि तुमची झोप सुधारू शकते.
आता सर्वसान्यांचा प्रश्न हा असतो की चालण्याने पोट कमी होतं का? चालणे हा व्यायामाचा सर्वात कठीण प्रकार तर नाही, परंतु शरीराला शेप येण्यासाठी आणि चरबी कमी करण्यासाठी हा एक प्रभावी मार्ग नक्कीच आहे. चालण्याने एकूणच चरबी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे परिणामी हळूहळू पोटाची चर्बी देखील कमी होते. पण सोबतच व्यायाम केलं तर तुम्हाला पोट कमी करण्यासाठी मदत नक्की होईल.