ऑलिम्पिकमध्ये भालाफेक करत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्रासोबत ते गप्पा मारत होते. त्यावेळी त्यांनी त्याला चूरमा घ्यायला दिलं. नीरजने पीएम मोदींनाही आपल्यासोबत चूरमा खाण्याची विनंती केली. पण मोदींनी त्याला नकार दिला. पंतप्रधान मोदी यांनी आपण दिवसातून एकच वेळ जेवत असल्याचं सांगितलं आणि यामागील कारणही त्यांनी सांगितलं. आता चातुर्मास आहे आणि यावेळी मी दिवसभरात फक्त एकच वेळ जेवतो, असं ते म्हणाले. हे वाचा - चुकीच्या वेळी फळं खाणं ठरेल धोक्याचं, जाणून घ्या कधी खावीत चातुर्मास हा जैन धर्मातील एक पर्व आहे. या कालावधीत धार्मिक कार्य केली जातात. तसंच काही पदार्थ खाणं टाळलं जातं. शिवाय या कालावधीतल वातावरण पाहता लोक दिवसभरात एकाच वेळचं जेवण करतात. पंतप्रधान मोदीसुद्धा याचा अवलंब करतात.टोक्यो ओलंपिक में जेवलिन थ्रो में स्वर्ण पदक जीतने वाले @Neeraj_chopra1 को चूरमा खिलाकर, प्रधानमंत्री श्री @narendramodi ने उन्हें सुनाया स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जी से जुड़ा एक किस्सा। pic.twitter.com/Y0OsoTq58H
— BJP (@BJP4India) August 18, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Narendra modi, PM narendra modi