मुंबई, 17 जून : कडाक्याच्या उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी लोक पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहतात. कोकणासह राज्यातील अनेक भागात पावसाला सुरुवातही झाली आहे. निरोगी राहण्यासाठी पावसाळ्यात काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. खरं तर, मान्सून कधीच एकटा येत नाही, तो सोबत संसर्ग आणि ऍलर्जीसारख्या समस्या घेऊन येतो. कारण उन्हाळ्यातील उष्णता थंड आणि ओल्या हवामानात (Monsoon Health Tips) बदलते.
या विषयावर
द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना वोक्हार्ट हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिसिन कन्सल्टंट डॉ. अनिकेत मुळ्ये म्हणाले की, पावसाळा सुरू होण्यापूर्वी ऋतू बदलासाठी आपल्या शरीराची तयारी करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपण कोणत्याही प्रकारे हवामान बदलाचा त्रास टाळू शकाल. संक्रमण, अॅलर्जी आणि रोगांपासून स्वतःचे संरक्षण करण्याससाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
व्यायाम करा -
उन्हाळ्यातील उष्ण हवामान ओलसर आणि थंड हवामानात बदलते, तेव्हा आपण दररोज थोडा वेळ व्यायाम करणे आवश्यक आहे. यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल. यामुळे रक्ताभिसरण बरोबर होईल, तसेच हृदयही चांगले काम करेल. यासाठी आपण चालणे, स्किपिंग, सायकलिंग आणि रनिंग यासारख्या व्यायामांचा दैनंदिन दिनचर्येत समावेश करू शकता. डॉक्टरांच्या मते, आठवड्यातून किमान 5 दिवस व्यायाम केल्यास निरोगी आयुष्य जगता येते.
चांगला आहार घ्या -
पावसाळा हा सूक्ष्मजीवांच्या वाढीचा काळ असतो, त्यामुळे संसर्ग, अॅलर्जी आणि विषाणूजन्य ताप यासारख्या समस्या वेगाने पसरतात. ते टाळण्यासाठी आपण निरोगी आहार घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी ताजी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, शेंगा आणि कडधान्यांचा आहारात समावेश करा. तसेच हळद, आले आणि लसूण यांचा आहारात उपयोग करा. पण निरोगी राहण्यासाठी सकस आहार आवश्यक आहे, तसेच मसालेदार, तेलकट, जंकफूड, रस्त्यावरील आणि पॅकबंद खाद्यपदार्थांबरोबरच दारू आणि धूम्रपानापासून दूर राहणे आवश्यक आहे. यासोबतच जंतू राहु नयेत म्हणून भाज्या गरम पाण्याने धुण्यास विसरू नका. अतिसार किंवा अपचनाची समस्या असल्यास ओआरएसचे पाणी प्या. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करेल.
हे वाचा -
डोळ्यांच्या पापण्या फडफडण्याचा अर्थ काय? धार्मिक आणि वैज्ञानिक कारण समजून घ्या
शरीर हायड्रेटेड ठेवा -
या ऋतूत शरीराला हायड्रेट ठेवण्याचीही गरज असते. यासाठी पुरेसे पाणी प्या, जेणेकरून तुमच्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडू शकतील. तसेच आल्याचा चहा, ग्रीन टी किंवा कॅमोमाइल चहाही पिऊ शकता. हर्बल चहा पोटासाठी चांगला आहे आणि शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करू शकते. यासोबतच तुम्हाला हेही लक्षात ठेवावे लागेल की कॉफी, चहा आणि सोडा यांसारख्या पेयांचे अतिसेवन करू नका कारण यामुळे शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते.
हे वाचा -
मुलांच्या मेंटल ग्रोथसाठी या टिप्स आहेत उपयोगी; लहान असल्यापासूनच होईल फायदा
दिवसातून दोनदा आंघोळ करा -
जास्त घाम येणे आणि ओलाव्यामुळे होणारी घाण यापासून मुक्त होण्यासाठी दिवसातून किमान दोनदा अंघोळ करण्याची सवय लावा. यामुळे तुम्ही इन्फेक्शन आणि अॅलर्जीसारख्या समस्यांपासून दूर राहू शकाल. कामावरून, ऑफिसमधून किंवा शाळा-कॉलेजवरून आल्यावर आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर केल्यास उत्तम. यामुळे तुम्ही इन्फेक्शन आणि अॅलर्जीपासून बर्याच प्रमाणात दूर राहू शकाल, ज्यामुळे तुमचा आजारी पडण्याचा धोका खूप कमी होईल.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.