मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Street Food खाऊनही बिघडणार नाही तुमचं आरोग्य; फक्त या 3 बेसिक गोष्टी फॉलो करा

Street Food खाऊनही बिघडणार नाही तुमचं आरोग्य; फक्त या 3 बेसिक गोष्टी फॉलो करा

अनेक राज्यांमध्ये अजूनही पाऊस पडत आहे आणि या काळात बाहेरचे खाल्ल्याने विषबाधा होण्याची सर्वाधिक शक्यता असते. वातावरणातील ओलाव्यामुळे बाहेरील अन्नामध्ये बॅक्टेरिया झपाट्याने वाढू लागतात.

अनेक राज्यांमध्ये अजूनही पाऊस पडत आहे आणि या काळात बाहेरचे खाल्ल्याने विषबाधा होण्याची सर्वाधिक शक्यता असते. वातावरणातील ओलाव्यामुळे बाहेरील अन्नामध्ये बॅक्टेरिया झपाट्याने वाढू लागतात.

अनेक राज्यांमध्ये अजूनही पाऊस पडत आहे आणि या काळात बाहेरचे खाल्ल्याने विषबाधा होण्याची सर्वाधिक शक्यता असते. वातावरणातील ओलाव्यामुळे बाहेरील अन्नामध्ये बॅक्टेरिया झपाट्याने वाढू लागतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 20 सप्टेंबर : बाहेरील मसालेदार आणि चविष्ट खाद्यपदार्थ सर्वांनाच आवडतात, परंतु बाहेरील खाद्यपदार्थ बऱ्याचदा आरोग्यावर वाईट परिणाम करतात. विशेषत: पावसाळ्यात बाहेरचे अन्न खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होण्याची समस्या उद्भवते. पावसाळ्यात अन्नातून विषबाधा होण्याचा धोका जास्त असतो. या ऋतूमध्ये वातावरणातील ओलाव्यामुळे बाहेरील अन्नामध्ये बॅक्टेरिया झपाट्याने पसरू लागतात, ज्यामुळे अन्नामध्ये बॅक्टेरियाचा संसर्ग वाढतो.

केवळ पावसाळ्यामुळेच नाही तर बऱ्याचदा शिळे अन्न खाल्ल्यानेदेखील अन्नातून विषबाधा होण्याची समस्या उद्भवते. फूड पॉयझनिंगची समस्या टाळण्यासाठी ताज्या आणि कमी तेलकट पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळता येईल, याबद्दल आज आम्ही माहिती देणार आहोत.

सोशल मीडियाचा अतिरेक मानसिक आरोग्यासाठी 'स्लो पॉयझन', संशोधनात मोठा खुलासा

अन्नातून विषबाधा कशी होते?

अन्नजन्य आजार ज्याला अन्न विषबाधा म्हणून ओळखले जाते. हे खराब, दूषित आणि विषारी अन्नामुळे होते. हेल्थलाईननुसार पावसाळ्यात बाहेरचे दूषित अन्न खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते. काही वेळा शिळ्या अन्नामुळे अन्नातून विषबाधाही होते. अशा अन्नामध्ये बॅक्टेरिया सहज वाढतात. दूषित पाण्यामुळे अन्न विषबाधा देखील होऊ शकते. यामध्ये उलट्या, मळमळ, ओटीपोटात दुखणे आणि अतिसार यांसारख्या लक्षणांचा समावेश होतो. अन्नातून विषबाधा झाल्यास शरीर खूप कमकुवत आणि अशक्त होते.

कच्चे अन्न खाऊ नका

फूड पॉयझनिंग टाळण्यासाठी नेहमी पूर्णपणे शिजवलेले अन्न खाणे महत्वाचे आहे. पावसाळ्यात बाहेरचे अन्न खराब होण्याचे कारण म्हणजे ते व्यवस्थित शिजवले जात नाही. रस्त्यावरील खाद्यपदार्थ किंवा बाहेरील खाद्यपदार्थ ग्राहकांना लवकर देण्यासाठी कमी शिजवले जातात. कधी कधी भाजी किंवा पोळ्यादेखील कच्च्या असतात. जे पोटात जाऊन संसर्गाचे कारण बनते. पावसाळ्यात कच्चे अन्न टाळावे.

हात स्वच्छ करणे

फूड पॉयझनिंग हे केवळ कच्चे किंवा खराब झालेले अन्न खाल्ल्याने होत नाही, तर हातामध्ये असलेले बॅक्टेरियाही त्यासाठी जबाबदार असू शकतात. अन्न खाण्यापूर्वी हात धुणे किंवा स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. हातामध्ये असे अनेक बॅक्टेरिया असतात जे दिसत नसले तरी त्यांचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळा

पावसाळ्यात दुग्धजन्य पदार्थ पोट खराब करू शकतात. दूध, चीज आणि ताक यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये बॅक्टेरिया खूप वेगाने पसरतात. जास्तवेळ साठवलेल्या दुधात बॅक्टेरिया लवकर वाढतात, म्हणून ताजे दूध, चीज किंवा दही वापरा. शक्य असल्यास काही दिवस दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नका.

जेवण केल्यानंतर लगेच अंघोळ करणे योग्य आहे का? पाहा आरोग्यावर कसा होतो परिणाम

फूड पॉयझनिंगची लक्षणे

- अतिसार

- उलट्या होणे

- पोटदुखी

- अशक्तपणा

- चक्कर येणे

First published:
top videos

    Tags: Food, Health Tips, Lifestyle