मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Chanakya Niti: अतिप्रमाणात सहनशीलता बरी नव्हे; लोक ठरवतील भित्रट

Chanakya Niti: अतिप्रमाणात सहनशीलता बरी नव्हे; लोक ठरवतील भित्रट

चाणक्य यांनी सांगितलेल्या नीति आजही जीवन जगतांना उपयोगात येतात.

चाणक्य यांनी सांगितलेल्या नीति आजही जीवन जगतांना उपयोगात येतात.

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी सांगितलेल्या नीतिनुसार (Niti) माणसाने दरवेळी धैर्यानेच वागंल पाहिजे असं नाही, कारण लोक गैरसमज करून घेतात.

दिल्ली,29 जून : चाणक्य (Chanakya) हे एक कुशल राजकारणी,चतुर मुत्सद्दी,कुटनिती तज्ज्ञ,अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचीत होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य (Kautilya) म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या नीति  कठीण काळामध्ये (Difficult Time)व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात.चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या (Good) आणि वाईट गोष्टी (Bad Things)ओळखण्याची क्षमता(Capacity)येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही (peaceful life)जगता येतं.त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. खरोखरच सुखी, संपन्न, समाधानी आयुष्य जगायचं असेल तर चाणक्यनीति नुसार आयुष्य जगा.

चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी अनेक गोष्टींबद्दल वर्णन केलं आहे. आयुष्यात येणारी आर्थिक संकटं, वैवाहिक जीवन, नोकरी, व्यापार, मैत्री, शत्रु या सगळ्यांबद्दल आचार्य चाणक्य यांनी काहीनाकाही भाकीतं करून ठेवलेली आहेत.

(Chanakya Niti : फसवे मित्र घालतील खड्ड्यात; मैत्री करताना हे लक्षात ठेवा)

आचार्य चाणक्य सांगतात प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते प्रमाणापेक्षा जास्त धिर धरणाऱ्याना इतर लोक भित्रे ठरवायला लागतात. बर्‍याच लोकांना असं वाटतं की एखाद्या घटनेमध्ये आपण पेशन्स ठेवूनच वागले पाहिजे.पण दरवेळी हा विचार बरोबर ठरेलच असं नाही.

चाणक्य यांच्या मते, आयुष्यात आपला अनेक लोकांशी सामना होत असतो. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. त्यामुळे सगळेचजण चांगला विचार करतील असं नाही. त्यामुळे आपल्या आत्मसन्माला ठेच पोहचवणाऱ्यांना लगेच उत्तर द्यायला शिकलं पाहिजे. योग्यवेळी आपण उत्तर न दिल्यामुळे समोरच्या व्यक्तीला चुकीचा मेसेज जातो.

(Chanakya Niti: निंदा ऐकून चिडू नका; व्हाल लोकांच्या हातातलं बाहुलं)

तुम्ही पेशन्सने वागत असलात तरी, समोरची व्यक्ती तुम्हाला घाबरट ठरवतो. त्यामुळे बऱ्याच वेळा माणसाच्या धैर्य हा गुण वेगप्रसंगी अवगुण देखील ठरू शकतो. त्यामुळे धैर्य दाखवताना आपला स्वाभिमान दुखावणार नाही याची काळजी घ्यावी.

आपल्या जवळच्या व्यक्तीने आपल्याला दुखावल्यानंतरही त्याला योग्य वेळी उत्तर द्यायला हवं. बऱ्याच घटनांमध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीने आपला आत्मसन्मान दुखावला तरीदेखील त्याला वाईट वाटले हा विचार करून आपण गप्प राहतो.

(साप्ताहिक राशीभविष्य: हा आठवडा 3 राशींसाठी आहे परीक्षेचा काळ)

मात्र, आपल्या गप्प राहण्यामुळे आपले आप्तेष्ट सुद्धा आपल्याला भित्रच ठरवत असतात. त्यामुळे आचार्य चाणक्य सांगतात धैर्याची सुद्धा एक सीमा असते प्रमाणाच्या पलीकडे धैर्याने वागू नये.

(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

First published:
top videos