जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / India@75 : भारतीय ध्वजाची निर्मिती कशी झाली? अनेकदा बदलली 'तिरंगा'ची डिझाईन

India@75 : भारतीय ध्वजाची निर्मिती कशी झाली? अनेकदा बदलली 'तिरंगा'ची डिझाईन

India@75 : भारतीय ध्वजाची निर्मिती कशी झाली? अनेकदा बदलली 'तिरंगा'ची डिझाईन

Independence Day, Indian Flag Background: राष्ट्रध्वजाच्या सध्याच्या डिझाइनला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी त्यात अनेक वेळा बदल करण्यात आले आहेत. 15 ऑगस्ट 2022 रोजी 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतात दरवर्षी या तारखेला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. यंदा 76 वा स्वातंत्र्योत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा केला जाणार आहे. त्यासाठी देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. या निमित्ताने केंद्र सरकारने घरोघरी तिंरगा ही मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक देशाचा स्वतःचा ध्वज असतो. भारतीय ध्वजाला ‘तिरंगा’ (Tiranga) म्हणतात कारण त्यात भगवा, पांढरा आणि हिरवा असे तीन रंग वापरले (Tiranga Colors) आहेत. हा ध्वज भारतात सुरुवातीपासून फडकवला गेला नसला तरी. पूर्वी त्याची रचना दुसरी (Indian Flag Background) होती. जाणून घ्या ‘तिरंगा’ कसा निर्माण झाला (Tiranga History). यंदा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य देशवासीयांना प्राणांची आहुती दिली. तर अनेकांनी आपलं साहित्य, गीत आणि केलेच्या माध्यमातून देशप्रेम जागृत केलं. अशीच आपल्या ध्वजाची देखील कहाणी आहे. आजचा आपला ध्वजाआधी अनेक प्रकारचे ध्वज तयार करण्यात आले होते. सध्याचा तिरंगा कधी स्वीकारण्यात आला? 22 जुलै 1947. कोणत्याही राष्ट्राचा ध्वज कशाचे प्रतीक आहे? अभिव्यक्ती आणि स्वातंत्र्य.

घरावर तिरंगा फडकवण्याआधी नवीन नियम माहिती असायला हवेत; अन्यथा होऊ शकतो ध्वजाचा अपमान

भारताचा पहिला ध्वज कधी आणि कोणी बनवला? 1904 मध्ये, विवेकानंदांच्या शिष्या सिस्टर निवेदिता यांनी प्रथम ध्वज बनवला, ज्याला निवेदिता ध्वज म्हणतात. पहिल्यांदा तिरंगा कधी आणि कोणी बनवला? 1906 मध्ये बंगालच्या फाळणीच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शचिंद्रकुमार बोस यांनी प्रथमच तीन रंगांचा झेंडा हातात घेतला होता. या ध्वजात वरच्या बाजूला भगवा, मध्यभागी पिवळा आणि तळाशी हिरवा रंग वापरण्यात आला होता. India@75 : फक्त भारतच नाही तर ‘हे’ पाच देशही 15 ऑगस्टला झाले स्वतंत्र; प्रत्येकाची कहाणी वेगळी परदेशात प्रथमच भारतीय ध्वज कधी फडकवण्यात आला? 1908 मध्ये भिकाजींनी जर्मनीत तिरंगा ध्वज फडकावला होता. त्यात वरच्या बाजूला हिरवा, मध्यभागी भगवा आणि तळाशी लाल रंग होता. हा ध्वज भिकाजी कामा, वीर सावरकर आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांनी संयुक्तपणे तयार केला होता. भारताच्या वर्तमान ध्वजाची रचना कोणी केली? सध्याच्या भारतीय राष्ट्रध्वजाची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात