मनसेच्या 'भोंग्या'ला मुस्लिम समाजाचं शांततेतून उत्तर, मुंबईत पहिल्यांदाच घडलं!
मोठ्या आवाजाचे तोटे काय आहेत? मोठ्या आवाजामुळे होणाऱ्या नुकसानीबद्दल बोलायचे तर त्याचे अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. यामध्ये कायमचे श्रवणशक्ती गमावण्याचा धोका समाविष्ट आहे. बराच वेळ मोठा आवाज ऐकल्याने मानसिक समस्या उद्भवू शकतात. माणूस चिडखोर आणि हिंसक देखील बनू शकतो. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की सतत 85 डेसिबलपेक्षा जास्त आवाज ऐकल्याने बहिरेपणा येऊ शकतो. एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो. मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम मोठा आवाज ऐकून उलट्याही होऊ शकतात. मज्जासंस्थेवर परिणाम झाल्यामुळे, स्पर्श जाणवण्यात समस्या असू शकते. त्यामुळे रक्ताभिसरणाच्या गतीवरही परिणाम होऊ शकतो. सततच्या आवाजामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. याशिवाय 120 डेसिबलपेक्षा जास्त आवाज गर्भवती महिलेच्या गर्भावर परिणाम करू शकतो. त्याचवेळी 180 डेसिबलपेक्षा जास्त आवाज मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो. कायदा काय म्हणतो? आता मोठ्या आवाजाबाबतचे नियम आणि कायदे याबद्दल बोलूया. 2000 साली या संदर्भात कायदा करण्यात आला. ध्वनी प्रदूषण (कायदा आणि नियंत्रण) या नावाखाली. हा कायदा 1986 मध्ये झालेल्या पर्यावरण (संरक्षण) कायद्यांतर्गत येतो. कायद्याच्या पाचव्या कलमात सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर आणि आवाजाची पातळी यावर विविध निर्बंध घातले आहेत. कोणताही कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात आयोजित करण्यासाठी किंवा ध्वनिक्षेपक लावण्यासाठी प्रशासनाकडून लेखी मान्यता घ्यावी लागणार आहे. रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वाजवले जाणार नाहीत.राज ठाकरेंनी दिलेला अल्टिमेटम संपला; त्यानंतरही राज्यातील मशिंदीमध्ये बदल झाला की नाही?
नियमांनुसार, राज्य सरकार सार्वजनिक ठिकाणी रात्री 12 वाजेपर्यंत अशा कार्यक्रमांना परवानगी देऊ शकते. मात्र, कोणत्याही परिस्थितीत, ही मान्यता वर्षातील 15 दिवसांपेक्षा जास्त असू शकत नाही. क्षेत्रफळानुसार कोणीही औद्योगिक, व्यावसायिक, निवासी किंवा शांत क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या 100 मीटर परिसरात असे कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत, कारण सरकार या भागांना शांत क्षेत्र म्हणून घोषित करू शकते. या नियमानुसार सार्वजनिक आणि खाजगी ठिकाणी लाऊडस्पीकरची आवाज मर्यादा अनुक्रमे 10 डेसिबल आणि 5 डेसिबलपेक्षा जास्त नसावी. निवासी भागातील आवाजाची पातळी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत 55 डेसिबल आणि रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 45 डेसिबल ठेवता येईल. तर व्यावसायिक क्षेत्रात सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत 65 डेसिबल आणि रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 55 डेसिबल पातळी असावी. दुसरीकडे, औद्योगिक भागात सकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीत आवाजाची पातळी 75 डेसिबल ठेवली जाऊ शकते. त्याच वेळी, सायलेन्स झोनमध्ये, यावेळी आवाजाची पातळी अनुक्रमे 50 डेसिबल आणि 40 डेसिबल ठेवावी. उल्लंघन केल्यास पाच वर्षांपर्यंत कारावास या कायद्यांतर्गत शिक्षेचीही तरतूद आहे. उल्लंघन केल्यास पाच वर्षांपर्यंत कारावास किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. इथे देशातील वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आवाजाची मर्यादा ठरवून दिली आहे. कुठेही 70 डेसिबलपेक्षा जास्त नाही.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raj thacarey