मुंबई, 20 नोव्हेंबर : जगातील सर्वात मोठ्या सल्लागार कंपन्यांपैकी एक असलेल्या मॅकेन्झीने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की चीन जगातील सर्वात मोठा देश बनला आहे. अमेरिकेची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. मॅकेन्झीने हा अहवाल 10 देशांच्या बॅलेंस शीटच्या आधारे तयार केला आहे. यावर जगातील इतर एजन्सींनी अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही. मात्र, या अहवालातून असे दिसून आले आहे की जर जगातील संपत्ती वाढली असेल तर चीनच्या संपत्तीतही गेल्या 20 वर्षात प्रचंड वाढ झाली आहे.
मॅकेन्झीच्या अहवालानुसार, चीनची संपत्ती 2000 मध्ये $07 ट्रिलियन वरून $120 ट्रिलियन झाली आहे. दरम्यान, हे मूल्यांकन मॅकेन्झीने कसे केले हे स्पष्ट केलं नाही. जगातील इतर सर्व अहवालांनुसार, सध्या चीन 11 ट्रिलियन आहे, जी जीडीपी आणि कॅपिटानुसार आहे. यामध्ये अमेरिका 18 ट्रिलियनसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारत 2.26 ट्रिलियनसह 7 व्या क्रमांकावर आहे. याला अंदाजे 3 ट्रिलियनच्या जवळ मानले आहे. तसं पाहिलं तर चीनची झेप खरोखरच आश्चर्यकारक आहे.
एकेकाळी भारताची आर्थिक स्थिती चीनच्या तुलनेत चांगली होती. वास्तविकता अशी आहे की 40 वर्षांपूर्वी चीन भारतापेक्षा गरीब होता. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. देशात गरिबी होती, मोठी लोकसंख्या वाईट परिस्थितीत राहत होती. विलासी आयुष्य काय असते हेच चिनीमधील असंख्य लोकांना माहिती नव्हतं.
1978 नंतर परिस्थिती बदलली
जागतिक बँकेचा (world banik report) अहवाल सांगतो की, त्यावेळी चीनमध्ये भारताच्या तुलनेत 26 टक्के अधिक गरीब होते. पण 1978 नंतर चीनमध्ये झपाट्याने बदल होऊ लागले. आता तो जगातील सर्वात श्रीमंत देश मानला जातो. चीनमधील लोक भारतापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत झाले आहेत. अहवालानुसार, 1978 नंतर चीनने अनेक क्षेत्रांत सुधारणांचे कार्यक्रम हाती घेतले. त्याअंतर्गत चीनने उत्पादन आणि उद्योग क्षेत्रात वेगाने विकासकामे सुरू केली. जमीन सुधारणा, शिक्षण व्यवस्थेचा विस्तार आणि लोकसंख्या नियंत्रणाची पावले उचलली.
India-China Talks : भारत- चीन यांच्यात तब्बल 12 तास ‘या’ नाजूक मुद्द्यावर चर्चा!
भारत त्याकाळी अधिक समृद्ध होता
1978 मध्ये जेव्हा चीनने आर्थिक सुधारणा सुरू केल्या तेव्हा तेथील दरडोई उत्पन्न 155 अमेरिकी डॉलर होते तर भारताचे दरडोई उत्पन्न त्यावेळी 210 डॉलर होते. तेव्हा भारतात अधिक समृद्धी होती हे स्पष्ट आहे. पण, आज चित्र पूर्णपणे बदलले आहे. चीन समृद्धी आणि वैभवाने प्रत्येक क्षेत्रात खूप पुढे गेला आहे. निःसंशयपणे, लोक त्यांना अमेरिकेनंतर जगातील दुसरी सर्वात मोठी शक्ती मानू लागले आहेत. 1978 च्या सुधारणेने चीनने भारताला मागे टाकले.
चीनमध्ये दरडोई उत्पन्न
भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया 1991 मध्ये सुरू झाली. त्या काळात चिनी लोकांचे दरडोई उत्पन्न $331 वर पोहोचले तर भारतीयांचे प्रति उत्पन्न $309 होते. 2019 आता चीनचे दरडोई उत्पन्न भारताच्या तुलनेत पाचपट जास्त आहे. आकडेवारी दर्शवते की सध्या चीनमध्ये दरडोई जीडीपी सुमारे $10,500 आहे आणि भारतात ते $2191 च्या आसपास आहे.
2015 च्या आकडेवारीनुसार, जिथे चीनचे दरडोई उत्पन्न $7,925 होते, तिथं भारताचे दरडोई उत्पन्न फक्त $1,582 होते. चीनचे दरडोई उत्पन्न 25 वर्षांत 24 पटीने वाढले
आता चिनी आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत
एकेकाळी आपल्या तुलनेत गरीब असलेले चिनी लोक आपल्यापेक्षा जवळपास 5 पटीने श्रीमंत झाले आहेत. कारण, 1991 पासून आपले दरडोई उत्पन्न केवळ 5 पटीने वाढले आहे, तर या काळात चीनचे दरडोई उत्पन्न 24 पटीने वाढले आहे.
1978 पूर्वी चीनची अर्थव्यवस्था जगासाठी खुली नव्हती. माओच्या कारकिर्दीत चीनने जगाला प्रत्येक क्षेत्रात आपले दरवाजे बंद केले होते. माओचे उत्तराधिकारी डेंग जिओपियांग यांनी चीनची अर्थव्यवस्था खुली केली. त्यानंतर त्यांचा विकास आणि शहरीकरण अतिशय वेगाने झाले.
केवळ 20 टक्के लोक शहरांमध्ये राहत होते
1978 पूर्वी चीनची 90 टक्के लोकसंख्या अत्यंत गरिबीत जगत होती. केवळ 20 टक्के लोक शहरांमध्ये राहत होते. 1978 मध्ये चीन राजकीयदृष्ट्या चौकात उभा राहिला. सांस्कृतिक क्रांती आणि अध्यक्ष माओ यांच्या मृत्यूनंतर कुठे जायचे हे ठरवायचे होते. खरंतर तिथं माओचा प्रभाव इतका खोलवर रुजला होता की कोणताही बदल करणे फार कठीण होते. चीनच्या नव्या निर्णयावरही कम्युनिस्ट पक्षात दीर्घकाळ चर्चा झाली, की चीनने आता कुठे जायचे.
त्यादिवशी नवीन चीनचा जन्म झाला
अखेर, 18 डिसेंबर 1978 रोजी, चीनचे प्रमुख नेते डेंग शियापेंग यांनी प्रतिक्रिया दिली. त्यादिवशी बीजिंगमध्ये झालेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत त्यांचा विकसनशील कार्यक्रम आणि आर्थिक सुधारणा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा प्रकारे त्या दिवशी चीनचा जन्म झाला. ही चीनची दुसरी क्रांती होती. डेंग यांनी स्वत:ला लो प्रोफाइलमध्ये ठेवले पण त्यांचे संपूर्ण लक्ष चिनी अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यावर होते.
तो दिवस संपूर्ण चीनमध्ये साजरा करण्यात आला. लोक आनंदाने रस्त्यावर आले. जेवणाच्या टेबलावर कुटुंबीयांनी वाईनच्या बाटल्या उघडल्या आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 40 वर्षांनंतर चीनमध्ये सर्व काही बदलले आहे. जेव्हा हे सुरू झाले तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेत चीनचा वाटा फक्त 1.8% होता, जो 2017 मध्ये वाढून 18.2% झाला आहे.
India China Border Dispute: पँगाँग सरोवरापासून सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण; आज दहावी बैठक
खरे तर चीनने उदारीकरणाची संपूर्ण ब्लू प्रिंट तयार केली होती. चिनी नेत्यांनी केंद्र नियंत्रित नेतृत्वाचा आग्रह धरला. परंतु, स्थानिक सरकार, खाजगी कंपन्या आणि परदेशी गुंतवणूकदार यांच्यात चांगला संबंध निर्माण केला.
पूर्वी चीनच्या रस्त्यांवर सायकली दिसत होत्या
पूर्वी चीनच्या रस्त्यांवर सायकली दिसत होत्या. गाड्या क्वचितच होत्या. आता रस्ते गाड्यांनी भरलेले आहेत. देशभरात 3000 लाखांहून अधिक नोंदणीकृत कार आहेत. आता रस्त्यावर फारच कमी बाइक्स आणि सायकली आहेत. परिणामी तिथं वाहतूक कोंडी मोठी असते.
सतत वाढणारा जीडीपी GDP
सध्या चिनी बाजारपेठ मालाने भरलेली दिसते. चीनचा जीडीपी दिवसेंदिवस वाढत आहे. जगातील सर्वोत्तम चैनीच्या वस्तू चीनच्या बाजारपेठेत विकल्या जातात. सध्या, चीन हा जगातील सर्वात मोठा परकीय चलन साठा असलेला देश आहे ($3.12 ट्रिलियन). जीडीपीच्या आकारमानात हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. परकीय गुंतवणुकीला आकर्षित करण्यात जगात तिसऱ्या क्रमांकावर असताना. चीन सध्या मॅन्युफॅक्चरिंग महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे बोलले जात आहे. चीनच्या एका अहवालात म्हटले आहे की, गेल्या 10 महिन्यांत चीनमधील विदेशी भांडवल गुंतवणुकीत 17.48 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मैन्युफैक्चरिंग सुपरपॉवर
चीनची अर्थव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी शी जिनपिंग यांना उत्पादनाच्या बाबतीत देशाला महासत्ता बनवायचं आहे. यासाठी शी जिनपिंग डँग शिओपिंगची धोरणे पुढे नेत आहेत, ज्यामध्ये अर्थव्यवस्था खुली करणे आणि आर्थिक सुधारणा यासारख्या पावलांचा समावेश आहे.
त्यासाठी त्यांनी विशेष आर्थिक क्षेत्र तयार केले. चीनने विशेष आर्थिक क्षेत्रासाठी दक्षिणेकडील किनारी प्रांतांची निवड केली. चीनचा परकीय व्यापार 17,500 टक्क्यांनी वाढला आहे. 2015 पर्यंत, ते परकीय व्यापारात जागात आघाडीचे बनले आहे. 1978 मध्ये चीनने वर्षभर जेवढा व्यवसाय केला नसेल तेवढा आता फक्त दोन दिवसांत करतात.
चीनचे उत्पादन भारताच्या तुलनेत 1.6 पट
चीन भारतापेक्षा कितीतरी अधिक मालाचे उत्पादन करतो. चिनी कामगार भारतापेक्षा 1.6 पट जास्त उत्पादन करतात. याचा अर्थ एक देश म्हणून चीनची उत्पादकता भारताच्या तुलनेत 60 टक्के अधिक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Border, China, India china