प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूच्या (Taapsee Pannu) घरावर आयकर विभागानं धाड टाकली. आयकर विभागाच्या पथकानं तापसीच्या मुंबईतील मालमत्तेवर छापे टाकले. (IT raid Taapsee Pannu) मात्र या कारवाईत त्यांच्या हाती अक्षेपार्ह अशी कुठलीही गोष्ट लागली नाही. दरम्यान या कारवाईवर आता तापसीनं प्रतिक्रिया दिली आहे. मी कुठल्याही प्रकारचा आर्थिक घोटाळा केलेला नाही कृपया खोटे आरोप करु नका अशी विनंती तिनं केलं आहे.
नेमकं काय म्हणाली तापसी?
“पॅरिसमध्ये मी कुठल्याही प्रकारचा बंगला खरेदी केलेला नाही. त्यामुळं पाच कोटी रुपयांची रिसिप्ट कुठून आली मला माहित नाही. शिवाय 2013 साली माझ्या घरावर कुठल्याही प्रकारची धाड टाकली गेली नव्हती.” अशा आशयाचं ट्विट करुन तिनं आयकर विभागाच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.
अवश्य पाहा - तापसीच्या बॉयफ्रेंडनं क्रीडा मंत्र्यांकडे मागितली मदत; उत्तर मिळालं, ‘तुम्ही आपल्या...’
3 days of intense search of 3 things primarily 1. The keys of the “alleged” bungalow that I apparently own in Paris. Because summer holidays are around the corner
— taapsee pannu (@taapsee) March 6, 2021
3. My memory of 2013 raid that happened with me according to our honourable finance minister
P.S- “not so sasti” anymore — taapsee pannu (@taapsee) March 6, 2021
तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप वारंवार केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करतात त्यामुळं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असा आरोप विरोधी पक्षनेते वारंवार करत आहेत. या आरोपांवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. अशी कारवाई 2013 साली देखील करण्यात आली होती त्यावेळी सर्वजण गप्प का होते? असा सवाल त्यांनी टीकाकारांना केला होता. २०१३ मध्ये काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काळात अनुराग कश्यप आयकर विभागाच्या नजरेखाली होते, अशा वृत्ताचा संदर्भ निर्मला सीतारामन यांनी दिला. विभागाने अनुराग कश्यपवर कर चुकवल्याचा आरोप केला होता. असा दावा देखील त्यांनी केला. अर्थात त्यांच्या प्रश्नाला तापसीनं या ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे.
'फँटम फिल्म'आणि 'क्वान' या कंपन्यांशी संबंधित असलेल्यांवर हे छापे टाकण्यात आले. त्यांनी कर चोरी केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं आयकर विभागानं म्हटलं आहे. या कर चोरी प्रकरणाचा तपास सुरू असल्याचंही आयकरनं म्हटलं आहे. फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती आणि त्याचं वितरण करण्याचं काम करते. अनुराग कश्यप, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाणे, निर्माता मधू मंटेना आणि विकास बहल यांनी ही कंपनी 2011 मध्ये सुरू केली होती. सहसंस्थापक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर कंपनी 2018 मध्ये बंद करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anurag kashyap, Bollywood News, Crime, Financial crime, Income tax, Raid, Taapsee Pannu