'नीज नीज आता... नीज रे मना... सुखमयी स्वप्न ते पाहना पुन्हा!', असे या अंगाई गीताचे शब्द आहेत. मालिकेत दीपू लवकरच बरी होणार आहे. त्यामुळे हे गाणं इंद्रा आणि दीपू यांच्यावरच शूट करण्यात येणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्याचप्रमाणे दीपू आणि तिच्या आईवर हे गाणं शुट करा अशा कमेंट देखील येत आहे. हेही वाचा - लग्नानंतर कामावर रूजू होताच हृताने शेअर केले 'ते' दोन फोटो, काय आहे यात खास? 'नीज नीज आता' हे गाणं समीहन (Samihan) याने संगीतबद्ध केलं असून गायिका कीर्ती किल्लेदार हिने गायलं आहे. तसेच अभिषेक खणकर (Abhishek Khankar) याने गाण्याचे शब्द लिहिले आहेत. गाण्यातील वादक किरण विणकर यांच्या बासरीचे मधुर स्वर मनाला स्पर्शून जातात. 'नीज नीज रे मना' हे गाणं लवकरचं मालिकेत पाहायला मिळणार आहे. हे गाणं ऐकायल्या नंतर चाहत्यांना हृताच्या आधीच्या मालिकेतील गाण्यांची आठवण झाली. मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी (Mandar Devsthali) यांच्या 'फुलपाखरु' (Phulpakharu) मालिकेतही अनेक सुंदर गाणी होती. याचीच आठवण अनेक चाहत्यांना झाली आहे. गाण्याच्या मेकिंग व्हिडीओवर कमेंट करत एका युझरने म्हटलंय, 'मंदार देवस्थळी सरांच्या फुलपाखरू मालिकेत जे गाणे आहेत त्या गाण्याला आज पर्यंत कोणतीच सिरीयल तोड देउ शकली नाही'. तर अनेकांनी गायिका कीर्ती किल्लेदारच्या आवाजाचं तोंड भरुन कौतुक केलं आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Time pass marathi movie, Zee Marathi, Zee marathi serial