मुंबई, 19 नोव्हेंबर : बिग बॉस ओटीटी फेम आणि इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद नेहमीच निरनिराळे कपडे घालून आपल्या चाहत्यांना थक्क करते. उर्फीचे अनेक फोटो व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. आपल्या स्टाईल आणि कपड्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात असणारी उर्फी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. आता उत्कृष्ठ लेखक चेतन भगतने उर्फीविषयी वक्तव्य केलं आहे. चेतन भगतने केलेलं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आलंय. चेतन भगत हे त्यांच्या लेखणीसाठी तसेच त्यांच्या स्पष्ट बोलण्याच्या शैलीसाठी ओळखले जातात. साहित्य आज तकच्या मंचावर चेतन भगत यांनी आजच्या तरुणांना पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला. तरुणांच्या विकासासाठी इंटरनेट डेटा असणे किंवा वापरणे ही वाईट गोष्ट नाही, परंतु या इंटरनेटने आज प्रत्येकाला कमकुवत केले आहे. आजकालची पोरं फोनवर नुसती रील काढतात किंवा फोटो लाइक करायला लागले आहेत, असं चेतन भगतने म्हटलं. हेही वाचा - Disha Patani : ‘टायगर अभी जिंदा है…’ दिशाचे ‘या’ अभिनेत्यासोबत फोटो व्हायरल; नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया उर्फीविषयी बोलताना चेतन बघत पुढे म्हणाला, आज तरुणाई फक्त उर्फी जावेदच्या फोटोलाच पसंती देत आहे. मुलाखतीला गेल्यावर काय बोलणार, मला उर्फीच्या सर्व ड्रेसेसची माहिती आहे. पण इथे उर्फीची चूक नाही. ती तिचं करिअर घडवत आहे. पण लोक बिछान्यात शिरून उर्फीचे फोटो बघत आहेत. उर्फीचे सगळे फोटो पाहून मी पण आज आलो आहे. आज उर्फीने दोन फोन घातले आहेत. उर्फीसारखी लोकं भेटत राहतात.
उर्फी जावेदसोबत, चेतन भगत यांनीही उल्लू टीव्हीबद्दल आपले मत मांडले. तो म्हणाला की, घुबडाचे काम रात्री जागे राहणे आहे. उल्लू टीव्हीही फक्त रात्रीच दिसतो. चेतन भगतने पुढे त्यांच्या काळाबद्दल चर्चा केली जेव्हा इंटरनेटची कमतरता होती. म्हणूनच त्याने लेखनाचे काम सुरू केले. चेतन म्हणतो सध्या ज्या वयात अभ्यास करावा लागतो त्याच वयात डेटिंग आणि गर्लफ्रेंड बनवण्याकडे बरेच लक्ष जाते. पण लोक हे कसे विसरतात की, जर तुमच्याकडे चांगली नोकरी असेल तर तुम्हाला नक्कीच चांगली जीवनसाथी मिळेल.