इंदौरमध्ये गुरुवारी 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले. आता इंदौरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 89 झाली आहे.
पुणे, 04 एप्रिल : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वेगाने वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ही बातमी पुणेकरांची चिंता वाढवणारी आहे कारण पुण्यामध्ये गेल्या चोवीस तासास 14 नवे कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत तर 57 जणांचे अहवाल येणं अद्याप बाकी असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता 84 हून अधिक पोहोचली असून आतापर्यंत दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर, पिंरगुटमध्येही पॉजिटिव्ह रूग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. या सर्व रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून रुग्ण पॉझिटिव्ह सापडलेला परिसर हा सील करण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यामध्ये एकूण 1599 जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली असून यामध्ये 84 हून अधिक लोक कोरोना बाधित आढळले आहेत. तर यातील 170 जण विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. तर तब्बल 1406 जणांची चाचणी नेगेटिव्ह आली आहे. पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये निर्जंतुवकीकरण फवारा टनेल कोरोनाचा देशातील फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण शहरांमध्ये आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. यासाठी संपूर्ण शहरांमध्ये जंतूनाशक फवाराणीदेखील केली जात आहे. पुणे मनपाच्या आरोग्य विभागाने अवघ्या तीन दिवसात नायडू हॉस्पिटलच्या गेटवर निर्जंतवणुकीकरण फवारा यंञणा बसवली आहे. या सँनिटायझर फवारा टनेल पँसेजमुळे नायडू हॉस्पिटलमध्ये येणारा आणि जाणारा प्रत्येक व्यक्ती हा पूर्णपणे सँनिटाईज होऊनच बाहेर पडणार आहे. त्यामुळे या संसर्ग रूग्णालयात काम करणारे डॉक्टर्स नर्सेस आणि इतर स्टाफला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण कोरोनाच्या संसर्गाचा त्यांनाच मोठा धोका संभवतोय. राज्यात एकूण 490 कोरोनाचे रुग्ण दाखल झाले. त्यातले 20 बरे झाले आहेत. मुंबई – 278 पुणे (शहर व ग्रामीण भाग)– 70 मुंबई वगळून मंडळातीत इतर मनपा व जिल्हे 54 सांगली – 25 नागपूर – 16 अहमदनगर – 20 बुलढाणा- 5 यवतमाळ – 4 सातारा – 3 औरंगाबाद – 3 कोल्हापूर – 2 रत्नागिरी – 2 वाशिम-1 सिंधुदुर्ग – 1 गोंदिया – 1 जळगाव- 1 नाशिक – 1 उस्मानाबाद -1 इतर राज्य (गुजरात) – 01 खरा धोका एप्रिलअखेरी भारतात या साथीचा कहर (Peak of pendemic) या महिन्याच्या अखेरीला किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे लॉक डाउन संपलं तरी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेच लागणार आहेत. इटली आणि स्पेनमध्ये जे आत्ता घडत आहे तसा वेगाने फैलाव आणि वाढता मृत्युदर रोखायचा असेल तर घरात राहणं याला पर्याय नाही, असं तज्ज्ञ सांगतात. गर्दी टाळली तरच या विषाणूचं संक्रमण आटोक्यात राहील. भारतासारख्या देशात लोकसंख्या आणि राहण्याची पद्धत लक्षात घेता कोरोनाची साथ उग्र रूप धारण करू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.