भारतात आधार कार्ड हे अत्यावश्यक डॉक्यूमेंट आहे. सध्या आधार कार्ड प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचं झालंय. याच्याशिवाय तुमची अनेक महत्त्वाची कामे अपूर्ण राहू शकतात. आधार कार्डचे महत्त्व आणि गरजा लक्षात घेऊन, UIDAI देशातील नागरिकांना चांगल्या सेवा देण्यासाठी वेळोवेळी नवीन सेवा सुरू करत असते. या मालिकेत UIDAI ने नागरिकांच्या सुविधेसाठी आपल्या टोल फ्री क्रमांकावर दिलेल्या सुविधांमध्ये काही नवीन सेवा सुरू केल्या आहेत.
UIDAI ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट टाकली आहे. ज्यामध्ये IVRS वर नवीन सेवा सुरू झाल्याचं सांगितलं आहे. UIDAI ने माहिती दिली की, आधार कार्ड धारक आता टोल फ्री नंबर 1947 वर कॉल करून 24x7 IVRS सेवा घेऊ शकतात. Pan Card हरवलंय? तर डोंट वरी, सोप्या स्टेप्स फॉलो करुन मिळवा परत
नवीन सेवांनुसार नागरिक आधारच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून नवीन आधार कार्ड नोंदणीचे स्टेटर, आधार कार्डमधील कोणत्याही अपडेटचे स्टेटस, पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डरचे स्टेटस, कोणत्याही तक्रारीचे स्टेटस, जवळच्या आधार नोंदणी केंद्राची स्थिती जाणून घेऊ शकतात. Home Loan घेण्यापूर्वी अवश्य घ्या ही माहिती, स्वस्तात मिळेल होम लोन
याशिवाय आधार कार्डधारक टोल फ्री क्रमांकावर कॉल करून आवश्यक माहिती एसएमएसद्वारेही मिळवू शकतो.
UIDAI ने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर त्यांचे आधार कार्ड 10 वर्षांपूर्वी बनवले गेले असेल आणि त्यांनी या 10 वर्षांत एकदाही त्यांचे आधार कार्ड अपडेट केले नसेल तर त्यांनी त्यांचे आधार कार्ड अपडेट करून घ्यावे. फक्त आधार कार्ड असणे आवश्यक नाही तर तुमचे आधार कार्ड अपडेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. जर तुमचे आधार कार्ड अपडेट केले नसेल तर अशा परिस्थितीतही तुमची अनेक महत्त्वाची कामे अडकू शकतात. SBI क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांनो सावधान! 17 मार्चपासून...