JOIN US
मराठी बातम्या / देश / Karnataka Election Results: भाजपने रान पेटवूनही बजरंग बली काँग्रेसला कसा पावला? काँग्रेस नेत्याने दिलं उत्तर

Karnataka Election Results: भाजपने रान पेटवूनही बजरंग बली काँग्रेसला कसा पावला? काँग्रेस नेत्याने दिलं उत्तर

कर्नाटक निवडणुकीत भाजपकडून बजरंग बलीच्या मुद्द्याला खूप हवा देण्यात आली होती.

जाहिरात

बजरंग बली काँग्रेसला कसा पावला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बंगलोर, 13 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकी चा शेवटच्या टप्प्यातील प्रचार हा बंजरंगबली भोवती फिरला होता. काँग्रेसनं बजरंग दलावर बंदीचं आपल्या घोषणापत्रात जाहीर केल्यामुळे हा वाद पेटला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्यावरून काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कर्नाटकच्या जनेतनं बहुमताचा कौल काँग्रेसच्या बाजूनं दिला. त्यामुळे बजरंगबलीचा मुद्दा भाजपला तारू शकला नाही. कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बजरंगबलीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांना बजरंगबलीचं नाव घेऊन मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्यावरून प्रचारादरम्यान बरेच आरोप-प्रत्यारोप झाले होते. भाजपनं मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी हा मुद्दा पुढे केल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता. खरं तर काँग्रेसनं घोषणापत्र जाहीर केल्यानंतर प्रचारात बजरंगबलीची एन्ट्री झाली. बजरंग दलावर बंदी घालण्याचं आश्वासन काँग्रेसनं आपल्या निवडणूक घोषणापत्रात दिलं आहे. काँग्रेसचं घोषणापत्र जाहीर होताचं भाजपनं त्यावरून काँग्रसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसचा बजरंगबलीला विरोध असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. ऐन निवडणूक प्रचारात भाजप आणि बजरंग दलानं ठिकठिकाणी हनुमान चालीसा पठनचं आयोजन करुन वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजरंगबलीच्या मुद्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. विशेष म्हणजे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोदींनी आपल्या प्रत्येक सभेची सुरुवात ‘बजरंग बली’च्या जयघोषाणं केली. भाजपच्या या खेळीमुळे प्रचारात काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली होती. काँग्रेस नेत्यांकडून त्यावर वारंवार स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. निवडणूक प्रचारात भाजपच्या हाती आयताच बजरंगबलीचा मुद्दा मिळाला होता. त्यामुळे काँग्रेस बजरंग दलावर बंदीच्या मुद्यावरून सेल्फ गोल केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. वाचा - काँग्रेससाठी ‘भारत जोडो यात्रा’ संजीवनी, कर्नाटकात मेहनतीला कसे मिळाले फळ? पक्षाने सांगितलं कारण काँग्रेसमधील काही नेत्यांनी त्यावर उघड नाराजी व्यक्त केली होती. तर डी. के शिवकुमार यांनी काँग्रेसची सत्ता आल्यास बजरंगबलीच्या नावाने योजना सुरू करण्याचं आश्वास दिलं होतं. तसेच राज्यभरात हनुमानाची मंदिरं उभारण्याची घोषणाही त्यांनी केली होती. कर्नाटक प्रचारात भाजपनं बजरंगबलीच्या मुद्यावरून वातावरण निर्मिती केली. पण निवडणुकीचा निकाल पाहात बजरंगबली काँग्रेसला पावल्याचं चित्र आहे. काँग्रेस नेते के रहमान यांनी लगावला भाजपला टोला के रहमान म्हणाले, कर्नाटक हे उत्तर भारत नाही. येथे तुम्ही जातीय कार्ड खेळू शकत नाही. निवडणूक प्रचारात बजरंगबलींचा मुद्दा उपस्थित करून जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपने त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यांना कोणी महत्त्व दिले नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या