अरविंद केजरीवालांना सीबीआयचं समन्स
नवी दिल्ली, 14 एप्रिल : एकीकडे महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं असतानाच दिल्लीमध्येहीव खळबळ उडाली आहे. कथित दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवून चौकशीला बोलावलं आहे. 16 एप्रिलला सकाळी 11 वाजता केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
दिल्लीच्या कथित अवैध दारू घोटाळ्याप्रकरणी आधीच उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली आहे. अबकारी धोरण प्रकरणी मनिष सिसोदिया यांची चौकशी झाली होती, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी ईडीवर आरोप केले आहेत.अबकारी धोरण प्रकरणी खोटे पुरावे गोळा करून भ्रम तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. ईडी लोकांना त्रास देऊन त्यांच्यावर दबाव टाकून खोटी स्टेटमेंट घेत असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.