JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra School Reopen: तब्बल दीड वर्षानं आज वाजणार शाळेची पहिली घंटा, हे आहेत महत्त्वाचे नियम

Maharashtra School Reopen: तब्बल दीड वर्षानं आज वाजणार शाळेची पहिली घंटा, हे आहेत महत्त्वाचे नियम

शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला असला, तरीही मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती असणे महत्त्वाचे आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 04 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण, कोरोनामुळे (Coronavirus) राज्यातील बहुतेक शाळा मागील दीड वर्षांपासून बंद होत्या त्या आज अखेर सुरू (Maharashtra School reopen) होत आहेत. आजपासून ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. तर, शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. मात्र, शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला असला, तरीही मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती असणे महत्त्वाचे आहे. आजपासून शाळा सुरू होत असल्या तरी सरकारचे आणखी कुठले नियम आहेत तसंच पालकांना आणि शिक्षकांना काय सूचना देण्यात आलेल्या आहेत हे जाणून घेऊया - शाळा अनुकूल वातावरणात सुरू व्हाव्यात, यासाठी कृती आराखडा आखला आहे, त्याचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शाळेत प्रत्यक्ष भेट देऊन पूर्वतयारीबाबत व एकूणच परिस्थितीवर देखरेख ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. Record: सप्टेंबरमध्ये UPI द्वारे झाले इतक्या लाख कोटी रुपयांचे 3.65 अब्ज व्यवहार राज्यातील काही भागांत तब्बल दीड वर्षांनंतर शाळा सुरक्षितपणे पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षणाचा उत्सव होऊन विद्यार्थ्यांचे स्वागत व्हायला हवे, याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या आहेत , असंही राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. राज्य सरकारच्या सूचनांनुसार, मुलांना शाळेत पायी येण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहित करावं. ज्या शाळांमध्ये स्कूल बस किंवा खासगी वाहनाद्वारे विद्यार्थी येतात, अशा वाहनांमध्ये एका सीटवर केवळ एकच विद्यार्थी बसून प्रवास करेल, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगला महत्त्व आहे त्यामुळे वर्गातही योग्य शारीरिक अंतर राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी वर्गात एका बाकावर एकच विद्यार्थी बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळेत प्रार्थना, स्नेहसंमेलन किंवा तत्सम कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाहीत. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांमध्ये भरवण्यात येतील. यासोबतच प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी 3 ते 4 तासांपेक्षा अधिक नसावा, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. प्रत्यक्ष वर्गांसाठी जेवणाची सुट्टी नसेल, अशी सूचना देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

ठाकरे सरकार झाले अनाथांचे आधार, 306 मुलांच्या खात्यात 15 कोटी जमा! पहिल्या एक-दोन आठवड्यांमध्ये थेट शिक्षणावर भर न देता, विद्यार्थ्यांना शाळेची सवय होऊ द्यावी. कोव्हिड होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांशी सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे वागावे, अशा सुचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत विद्यार्थांना शाळेतला पहिला दिवस कायम स्मरणात राहिल, असा घालवण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः दीर्घ कालावधीनंतर उगवलेला हा दिवस उत्साहात साजरा करा. पहिल्या दिवसाचे उत्तम अनुभव आमच्यासोबत शेअर करा. शाळेतील तुमचे फोटो,व्हिडिओ,गाणी,कविता @thxteacher या ट्विटर खात्याला टॅग करून पोस्ट करा, असं त्यांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या