अद्वैत मेहता (प्रतिनिधी) पुणे, 25 ऑक्टोबर: पुण्यातून भाजप उमेदवार माधुरी मिसाळ तिसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. एकूणच मताधिक्य का कमी झालं याचा अभ्यास करण्याची गरज आहे. लोकसभेपेक्षा विधानसभेचा निकाल अनपेक्षित आहे. पंकजा मुंडेंचा जिव्हारी लागल्यामुळे जिंकल्याचा आनंदही साजरा करावा असं वाटत नाही अशी प्रतिक्रियया माधुरी मिसाळ यांनी दिली आहे.