JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : संपूर्ण देशात शिजणाऱ्या लातूरच्या डाळीचं वैशिष्ट्य माहिती आहे?

Video : संपूर्ण देशात शिजणाऱ्या लातूरच्या डाळीचं वैशिष्ट्य माहिती आहे?

लातूर हे डाळींचे आगार असून येथून संपूर्ण देशभरात डाळींची निर्यात होते. जिल्ह्यातील 150 डाळ मिलमधून रोज 3 हजार टन डाळ तयार होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 21 एप्रिल: रेल्वेने पाणी आणावे लागलेल्या लातूर जिल्ह्यात पाण्याची टंचाई असली तरी, अख्ख्या भारताला इथल्या डाळीचा गोडवा लागला आहे. जिल्ह्यातील दीडशे डाळ मिलमधून दररोज सुमारे तीन हजार टन डाळ तयार होते. ही डाळ आंध्र प्रदेशातील कर्नुलपासून तमिळनाडूतील कन्याकुमारीपर्यंत पाठवली जात आहे. त्यामुळे लातूरला डाळींचे आगार मानले जाते. डाळीच्या पिकांसाठी लातूरची ओळख लातूर जिल्ह्याची ओळख डाळींच्या पिकांसाठी आहे. येथे तूर, हरभरा, उडीद आणि मूग ही पिके घेतली जातात. लाल रंगाच्या तुरीचे आगर म्हणून ‘लातूर’ हे नाव पडले, असेही म्हटले जाते. शिवाय, शेजारच्या कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात तूर विक्रीसाठी लातूरला आणली जाते. येथील बाजार समितीत त्याच दिवशी माप होऊन शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. राज्यातील इतर बाजारपेठांच्या तुलनेत चांगला दर मिळतो. त्यामुळे महाराष्ट्राबरोबरच तेलंगणा, कर्नाटकातून शेतमाल विक्रीसाठी येतो़.

जिल्ह्यात सुमारे 150 डाळ उद्योग प्रकल्प जिल्ह्यात डाळ निर्मितीचे 150 प्रकल्प असून ही संख्या मराठवाड्यात सर्वाधिक आहे. या प्रकल्पासाठी दररोज 45 ते 50 हजार क्विंटल तुरीची खरेदी केली जाते. त्यातून दररोज 30 हजार क्विंटल अर्थात 3 हजार टन डाळ तयार होते. येथील डाळीस महाराष्ट्राबरोबर भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांसह गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे़. शेतकऱ्यांना हमीभाव मिळायला हवा लातूरमध्ये सध्या तुरीस 8 हजारांपर्यंत तर हरभऱ्याला 5 हजार रुपयांपर्यंत सर्वसाधारण दर मिळत आहे़. केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीपेक्षा हा दर कमी आहे़. त्यामुळे शेतकरी अडचणीत येऊन इतर पिकांकडे वळण्याची शक्यता असते. त्यामुळे शासनाने नाफेड अंतर्गत जास्तीत जास्त खरेदी केंद्र सुरु करुन शेतमाल खरेदी करणे आवश्यक आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले़. Sangli News: सांगलीच्या पैलवानाची शाही थंडाई पोहोचली दुबईत! पाहा कसा झाला प्रवास, Video 15 हजार मजुरांना मिळतो रोजगार लातूरमध्ये डाळ उद्योगातून 15 हजार मजुरांना रोजगाऱ़ मिळत आहे. त्यात बाजार समितीतील हमाल-मापाड्यांची संख्या वेगळी आहे. सदर व्यवसायात कौशल्य असलेल्यांना आणखी चांगला वाव आहे़. लातूरच्या डाळींची गुणवत्ता चांगल्या दर्जाची आहे.त्यामुळे लातूरच्या तूर डाळीसह विजय, जॅकी, काबुली हरभरा डाळीस सर्वाधिक मागणी असते, असे उद्योजक नितीन कलंत्री यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या