मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /तिघींपेक्षा शेफालीची कामगिरी सरस, टीम इंडियाच्या पराभवासाठी 'हे' ठरलं मोठं कारण

तिघींपेक्षा शेफालीची कामगिरी सरस, टीम इंडियाच्या पराभवासाठी 'हे' ठरलं मोठं कारण

आघाडीच्या फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ फक्त 99 धावाच करू शकला.

आघाडीच्या फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ फक्त 99 धावाच करू शकला.

आघाडीच्या फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ फक्त 99 धावाच करू शकला.

मेलबर्न, 08 मार्च : महिला टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. साखळी फेरीत अपराजित राहिलेल्या भारताला ऑस्ट्रेलियानं 85 धावांनी नमवलं. आघाडीच्या फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ फक्त 99 धावाच करू शकला. टीम इंडियाकडून अंतिम सामन्यात दिप्ती शर्मा वगळता इतर एकाही फलंदाजाला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर आत्मविश्वासाने उभा राहता आलं नाही.

भारताकडून यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारी शेफाली वर्मा अंतिम सामन्यात फक्त 2 धावाच काढू शकली. फक्त 16 वर्षांची असलेल्या शेफाली वर्माने गेल्या चार सामन्यात भारताच्या विजयामध्ये महत्वाची कामगिरी पार पाडली होती. मात्र तिच अपयशी ठरल्यानंतर इतर फलंदाजही मैदानावर टिकले नाहीत. स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, जेमिमाह रॉड्रिग्ज या आघाडीच्या फळीतील फलंदाज संपूर्ण स्पर्धेत अपयशी ठरल्या आहेत.

एकट्या शेफाली वर्माने जितक्या धावा काढल्या तितक्या धावा स्मृती मानधना, हरमनप्रीत आणि जेमिमाहला मिळून काढता आलेल्या नाहीत. गेल्या पाच डावात शेफालीने 163 धावा केल्या आहेत. तर स्मृती, जेमिमाह, हरमनप्रीत या तिघींनी मिळून 14 डावात 164 धावा केल्या आहेत. या तिघींपैकी एकजण जरी चांगली कामगिरी करू शकला असता तर परिस्थिती वेगळी असती.

अंतिम सामन्यात भारताला फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. भारताच्या सुमार क्षेत्ररक्षणामुळे ऑस्ट्रेलियानं 184 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारताला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. शेफाली वर्मा फक्त दोन धावांवर बाद झाली. संपूर्ण स्पर्धेत फॉर्ममध्ये असलेल्या शेफाली वर्मावरच भारतीय फलंदाजीची मदार होती. त्यानंतर तानिया भाटिया रिटायर्ड हर्ट झाली तर जेमिमाह शून्यावर बाद झाली. त्यामुळे भारताची अवस्था 2 बाद 8 अशी झाली. त्यानंतर स्मृती मानधनाही 11 धावांवर झेलबाद झाली.

पाहा VIDEO : एकटी लढली पण फायनलचा पराभव लागला जिव्हारी, शेफाली मैदानावरच रडली

भारताला सगळ्यात जास्त अपेक्षा असलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरला या सामन्यातही चांगली कामगिरी करता आली नाही. हरमनप्रीत कौर 4 धावांवर बाद झाली आहे. हरमन बाद झाल्यानंतर वेदा कृष्णामुर्ती आणि दीप्ती शर्मा यांनी काही अंशी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र जोनासनने जबरदस्त कॅच घेत वेदा कृष्णामुर्तीला 16 धावांवर बाद केले. त्यानंतर दीप्ति शर्माने 33 धावांची खेळी करत भारताचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र निकोला कॅरीने शर्माला बाद करत भारताला आणखी एक झटका दिला. दीप्ति शर्मा वगळता भारताच्या एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.

हे वाचा : Women's T20 World Cup : पराभवानंतरही टीम इंडियावर खूश शरद पवार, म्हणाले...

First published:

Tags: Cricket