कोलंबो, 16 जुलै : सध्या श्रीलंका हिंसाचार, भूक आणि आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष देश सोडून पळून गेले आहेत. देशात पेट्रोल-डिझेल यांसारख्या इंधनाची तीव्र टंचाई आहे. अनेक दिवस रांगेत उभे राहिल्यानंतर लोकांना पेट्रोल आणि डिझेल मिळत आहे. त्याचा थेट परिणाम क्रिकेटवरही होत आहे. श्रीलंकेचा क्रिकेटपटू चमिका करुणारत्नेने एएनआयला ही माहिती दिली. 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या करुणारत्नेने सांगितले की, देशात पेट्रोल आणि डिझेलची प्रचंड कमतरता आहे. मला सरावालाही जाता येत नाही. आशिया चषक आणि लंका प्रीमियर लीग (LPL) कसे होतील, हे माहित नाही. करुणारत्ने म्हणाला, ‘मी भाग्यवान होतो की दोन दिवस रांगेत थांबल्यानंतर मला पेट्रोल मिळाले, कारण देशात इंधनाचे संकट आहे. मला क्रिकेटच्या सरावासाठीही जाता येत नाही. मला फक्त 10 हजाराचे पेट्रोल मिळू शकले, जे फक्त 2-3 दिवस टिकेल. ऑगस्टमध्ये होणाऱ्या आशिया चषकचा श्रीलंका यजमान आहे. यासोबतच यावर्षी लंका प्रीमियर लीगही होणार आहे. याचा परिणाम आर्थिक आणि इंधनाच्या संकटामुळे होऊ शकतो. करुणारत्ने म्हणाला, ‘मी अशा दिवशी आलो आहे जेव्हा दोन महत्त्वाच्या मालिका आणि लंका प्रीमियर लीगची घोषणा झाली आहे. आशिया कपही येत आहे. LPL देखील शेड्यूल आहे. मला माहित नाही की काय होणार आहे, कारण मला सरावासाठी कोलंबोसह अनेक शहरांमध्ये प्रवास करावा लागेल. क्लब सीझनलाही हजेरी लावावी लागणार आहे.
#WATCH | Sri Lankan cricketer Chamika Karunaratne speaks to ANI; says, "We've to go for practices in Colombo&to different other places as club cricket season is on but I've been standing in queue for fuel for past 2 days. I got it filled for Rs 10,000 which will last 2-3 days..." pic.twitter.com/MkLyPQSNbZ
— ANI (@ANI) July 16, 2022
मात्र, ‘इंधनाच्या कमतरतेमुळे मला सरावाला जाता येत नाही. दोन दिवस कुठेही गेलो नाही. कारण पेट्रोलसाठी रांग लागली होती. नशिबाने आज मिळाले, पण 10 हजाराचे पेट्रोल दोन-तीन दिवसच टिकेल. आम्ही नुकताच ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना खेळला, तो खूप चांगला होता. आशिया चषक स्पर्धेची तयारीही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. हेही वाचा - Sri Lanka : श्रीलंकेचे राष्ट्रपती कुणाच्या मदतीनं मालदीवला पळाले? मध्यरात्रीच्या थराराची Inside Story तो म्हणाला, ‘मी यावर जास्त काही सांगू शकत नाही, पण काहीही बरोबर होत नाही आहे. आशा आहे की, योग्य लोक सत्तेत येतील आणि चांगले दिवस येतील. लोक फक्त चांगल्या लोकांनाच निवडतील. भारत हा आपल्या भावासारखा देश आहे. त्याने आम्हाला खूप मदत केली आहे. मी त्यांचे आभार मानतो. आम्ही अस्वस्थ आहोत. जेव्हा-जेव्हा आम्ही संघर्ष करत आलो तेव्हा त्यांनी आम्हाला साथ दिली. त्याने केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद, असेही श्रीलंकन क्रिकेटपटू चमिका करुणारत्ने म्हणाला.