हैदराबाद, 12 मे : आयपीएलच्या 12 व्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अंतिम सामना होणार आहे. या दोन्ही संघातील सामना हा हायवोल्टेज सामना असला तरी, या सामन्यात कोण बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या दोन्ही संघांनी आतापर्यंत तीनवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून चौथ्यांदा विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असतील. मुंबई आणि चेन्नई तीन वेळा फायनलला एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. यामध्ये मुंबईने दोनवेळा तर चेन्नईने एकवेळा विजय मिळवला आहे. यामुळे मुंबईचे पारडे जड असून चेन्नईला विजय मिळवणं आव्हानात्मक असेल. दरम्यान मुंबईची कामगिरी ही त्यांच्या सांघिक खेळीवर अवलंबून असली तरी, यात काही खेळाडूंचे प्रदर्शन मुंबईसाठी महत्त्वाचे असणार आहे. आज मुंबई संघासाठी महत्त्वाचा सामना असला तरी, मुंबईचा तुफानी फलंदाज केरॉन पोलार्ड याचा आज वाढदिवस आहे. दरम्यान गेल्या तीन वर्षांचा रेकॉर्ड पाहता, पोलार्डच्या वाढदिवसादिवशीच मुंबईनं सलग तीन सामने जिंकले आहेत. पोलार्डच्या वाढदिवसादिवशी म्हणजेच 12 मे रोजी मुंबईनं 2009, 2012, 2014 साली सामना जिंकला होता.
त्यामुळं आजही पोलार्डचा वाढदिवस मुंबईसाठी लकी ठरावा आणि मुंबईनं फायनल जिंकावी अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
@KieronPollard55 #HappybirthdayPollard brother Please give ur Bday gift in IPL 2019 final all ur fans need oNe outstanding innings in final pic.twitter.com/LfYffk1LK7
— Suriyha (@Suriyha7) May 11, 2019
पोलार्ड हा मुंबईकरिता खुप महत्त्वाचा खेळाडू असून, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीमध्ये त्याच्या योगदानाचा मुंबईला खुप फायदा होणार आहे. पोलार्डनं आयपीएलच्या या हंगामात 15 सामन्यामध्ये 155.55च्या स्ट्राईक रेटनं 238 धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. दरम्यान, साखळी फेरीत चेन्नईची कामगिरी चांगली राहिली आहे. तर मुंबईची सुरुवात नेहमीच खराब राहिली आहे. यंदाही पहिल्या क्रमांकावर असलेल्या चेन्नईला शेवटच्या क्षणी मागे टाकून मुंबई अव्वल ठरली होती. अंतिम सामन्यातला शानदार रेकॉर्ड 2013मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ गेल्या सहा वर्षात सर्वात जास्त यश मिळवलेला संघ आहे. मुंबईच्या संघानं 2013, 2015, 2017 अशी तीन विजेतेपदं मिळवली आहेत. त्यानंतर यंदा मुंबईच्या संघानं अंतिम सामन्यात धडक मारली आहे. एवढचं नाही तर मुंबईच्या संघाची अंतिम सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. मुंबईचा संघ एकूण 4 वेळा अंतिम सामन्यात पोहचला आहे. त्यात 3 वेळा त्यांनी विजेतेपद मिळवलं आहे. तर, चेन्नईनं 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2015 आणि 2018मध्ये फायनलमध्ये धडक मारली आहे. पण या संघानं केवळ तीन वेळा विजेतेपद मिळवलं आहे. चेन्नई विरोधात सर्वात चांगलं प्रदर्शन आयपीएलमधला सर्वात मोठा सामना म्हणजे मुंबई आणि चेन्नई यांच्यातला. दरम्यान या द्वंद्व युध्दात मुंबईचं प्रदर्शन जास्त चांगलं आहे. दोन्ही संघांनी एकूण 27 सामने खेळले आहेत. यात मुंबईनं 16 तर चेन्नईनं 11वेळा सामना जिंकला आहे. त्यामुळं जर चेन्नई अंतिम सामन्यात पोहचला तर, मुंबई फायनल जिंकू शकते. यशस्वी मधली फळी आयपीएलच्या बाराव्या हंगामाच्या सुरुवातीला मुंबईच्या संघाच्या मधल्या फळीचा खेळा चांगला नव्हता. मात्र त्यानंतर सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, पोलार्ड, क्रुणाल पांड्या यांचा स्ट्राईट चांगला आहे. याचा फायदा मुंबईला नक्कीच होणार आहे. आक्रमक गोलंदाजी मुंबईसाठी फलंदाजी सोबत गोलंदाजांची मोठी कुमक आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात गोलंदाजी सरस ठरली. मुंबईकडं सर्वश्रेष्ठ जलद गोलंदाज आहेत. यात बुमराह, मलिंगा यांचा समावेश आहे. अंतिम सामन्यात मलिंगाची कमी भासू शकते. VIDEO : राजकारणाच्या मैदानातील ‘सामना’, मतदानानंतर गौतम गंभीर म्हणतो…

)







