मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /INDvsNZ : पावसाने फेरले पहिल्या दिवसावर पाणी, अजिंक्यच्या एकहाती खेळीने भारताला वाचवलं

INDvsNZ : पावसाने फेरले पहिल्या दिवसावर पाणी, अजिंक्यच्या एकहाती खेळीने भारताला वाचवलं

अजिंक्य रहाणेनं दोन वर्षांनी कसोटी शतक साजरं केलं. हीच लय कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. परदेशात धावा करणाऱ्या रहाणेला घरच्या मैदानावर मात्र फारसं यश मिळालेलं नाही. कसोटीत 10 शतकं करणाऱ्या रहाणेनं भारतात फक्त 3 शतकं केली आहेत.

अजिंक्य रहाणेनं दोन वर्षांनी कसोटी शतक साजरं केलं. हीच लय कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. परदेशात धावा करणाऱ्या रहाणेला घरच्या मैदानावर मात्र फारसं यश मिळालेलं नाही. कसोटीत 10 शतकं करणाऱ्या रहाणेनं भारतात फक्त 3 शतकं केली आहेत.

विराटच्या नेतृत्वाखाली सध्या भारताचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर आहे.

वेलिंग्टन, 21 फेब्रुवारी : न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथील मैदानात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेला भारतीय संघ पत्त्यासारखा कोसळला. मात्र पावसामुळं पहिला दिवस 122-5 धावांवर संपला. सध्या उप-कर्णधार अजिंक्य रहाणे 38 धावांवर तर ऋषभ पंत 10 धावांवर खेळत आहे.

याआधी रोहित शर्माच्या जागी फलंदाजीसाठी आलेल्या पृथ्वी शॉला चांगली सुरुवात करता आली नाही. पृथ्वी शॉ फक्त 16 धावांत बाद झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजारालाही विशेष चांगली खेळी करता आली नाही. पुजारा 11 धावा करत बाद झाला. पुजारा बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानात आला. कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र केवळ 2 धावा करत कोहली माघारी परतला. न्यूझीलंडच्या भूमीवर कर्णधार म्हणून विराटची ही सगळ्यात कमी धावसंख्या आहे. कोहली बाद झाल्यानंतर मयंक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणे यांनी भारताचा डाव सावरला. लंच पर्यंत भारताच्या तीन विकेट गेल्या होत्या. मात्र लंचनंतर मयंक 34 धावांवर बाद झाला. चहापानाआधीच भारताचा अर्धा संघ माघारी गेला आहे. त्यामुळं आता भारताची मदार ही अजिंक्य रहाणेवर आहे. रहाणे 38 धावांवर फलंदाजी करत आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळतो असं मानलं जातं. पण भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात मात्र वातावरण वेगळं आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असे आहेत. त्यामुळे कोणत्याच संघाला विजयाचा दावेदार मानता येणार नाही. न्यूझीलंडच्या संघाने घरच्या मैदानावर गेल्या 14 कसोटी मालिकांपैकी केवळ दोन मालिका गमावल्या आहेत. भारतानंतर घरेलू मैदानावर अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा नंबर लागतो. 2018 नंतर भारताने घरच्या मैदानावर एकही मालिका गमावली नाही तर न्यूझीलंडने 2017 मध्ये शेवटचा पराभव पत्करला होता.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका महत्वाची असणार आहे. आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये न्यूझीलंडचे मोठे आव्हान भारताला आहे. सध्या भारताचे 360 गुण झाले असून कागदावर तरी न्यूझीलंडपेक्षा भारत पुढे आहे. तर न्यूझीलंडला घरच्या मैदानाचा फायदा आहे.

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. टी20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर उद्यापासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. टी20 मध्ये भारताने 5-0 ने बाजी मारली तर एकदिवसीय मालिका न्यूझीलंडने जिंकली. विराटच्या नेतृत्वाखाली सध्या भारताचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने यात कोण बाजी मारणार हे सांगणं कठीण आहे. या मालिकेत विराट कोहली अंतिम अकरा जणांमध्ये कोणाला संधी देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

प्लेइंग इलेव्हन : पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

वाचा : 'सिनिअर-ज्युनिअर मुद्दाच नाही, पंतने स्वीकारावं की...',रहाणेनं दिला सल्ला

First published:
top videos