मुंबई, 3 जुलै : भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात एजबस्टनमध्ये सुरू असलेल्या पाचव्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ऑल राऊंडर रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) शतक झळकावलं. जडेजाचं विदेशातील हे पहिलंच शतक असून टीम इंडियानं 100 रनच्या आत 5 विकेट्स गमावल्यानंतरच्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये त्यानं ही कामगिरी केली आहे. भारतीय टीमचा स्कोअर 400 रनच्या पुढे नेण्यात जडेजाच्या या शतकाचा मोठा वाटा आहे.
एजबस्टनमध्ये शतक झळकावलेल्या जडेजासाठी आयपीएल स्पर्धा (IPL 2022) निराशाजनक ठरली होती.. पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) टीमची कॅप्टनसी जडेजाकडे सोपवण्यात आली होती. पण खेळाडू आणि कॅप्टन म्हणून फेल गेल्यानंतर त्यानं अर्ध्या सिझननंतरच कॅप्टनसी सोडली. महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) पुन्हा एकदा सीएसकेचा कॅप्टन झाला. त्यानंतर जडेजानं दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली. जडेजानं पहिल्यांदाच आयपीएलमधील सर्व घटनांवर प्रतिक्रिया दिली आहे.
एजबस्टन टेस्टच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जडेजानं सांगिकलं की, 'जे झालं ते झालं. मी त्यामधून बाहेर पडलो आहे. आयपीएल माझ्या डोक्यात नाही. भारतीय टीमकडून खेळताना संपूर्ण लक्ष हे टीमच्या विजयावर असला पाहिजे. माझंही त्यावरच लक्ष आहे. भारतासाठी चांगली कामगिरी करण्यासारखी आनंदाची गोष्ट कोणतीही नाही.' असे तो म्हणाला.
IND vs ENG : नशीब असावं तर बुमराहासारखं, दोन्ही चुकांचा झाला टीम इंडियाला फायदा
भारताच्या बाहेर शतक झळकावणं ही खरंच खास गोष्ट आहे. विशेषत: इंग्लंडमध्ये एक खेळाडूासाठी 100 रन करणे ही खरोखर मोठी गोष्ट आहे. यामुळे आत्मविश्वासामध्ये भर पडतो. इंग्लंडमधील स्विंग परिस्थितीमध्ये शतक झळकावणे हा संस्मरणीय अनुभव आहे,' असे जडेजाने स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.