मुंबई, 20 एप्रिल : भारतात ग्रहणाबाबत अनेक प्रकारच्या धार्मिक श्रद्धा/समजुती आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणाचा प्रभाव प्रत्येक राशीवर वेगवेगळा असतो. सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण असो, ते प्रत्येक राशीसाठी शुभ आणि अशुभ परिणाम देते. विज्ञानानुसार, ग्रहण ही खगोलीय घटना आहे, परंतु ज्योतिषशास्त्र मानते की, ग्रहणाचा प्रभाव प्रत्येक राशीवर निश्चितपणे दिसून येतो. ग्रहणाचे नकारात्मक प्रभाव थांबवणे कठीण आहे, परंतु काही उपाय आहेत, ज्याद्वारे तुम्ही ग्रहणाच्या दुष्परिणामांपासून स्वतःचा बचाव करू शकता. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तू तज्ज्ञ पंडित हितेंद्र कुमार शर्मा सूर्यग्रहणाच्या काळात कराव्या लागणाऱ्या अशा उपायांबद्दल सांगत आहेत, ज्यामुळे आपल्या जीवनात सदैव समृद्धी येईल. सूर्यग्रहणाचा प्रभाव - जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्यग्रहणाचा प्रभाव व्यापक असेल तर अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात कधीही स्थिर राहू शकत नाहीत. काही लोक सूर्यग्रहणानंतर हाडांमध्ये वेदना होत असल्याचे तसेच आत्मविश्वास कमी झाल्याचे सांगतात. सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना पित्याकडून सुख मिळत नाही आणि शासनाकडून शिक्षाही मिळते.
शरीरात जडपणा, तोंडात वारंवार थुंकी येणं, अर्धांगवायू होणे अशा तक्रारीही काहींच्या बाबतीत होतात. सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य आणि शनि एकाच घरात असल्यास घरातील स्त्रियांना त्रास होतो. जर सूर्य आणि मंगळ एकत्र असतील आणि चंद्र आणि केतू एकत्र असतील तर मुलगा, मामा आणि वडील यांना त्रास होतो. सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे घरगुती समस्या, अपयश, विवाहात विलंब, संततीला विलंब, संततीला त्रास, हे सर्व परिणाम दिसून येतात. हे वाचा - सूर्यग्रहण लागताच राशीनुसार करा या मंत्राचा जप; गर्भवती महिलांसाठी हा उपाय प्रभावी सूर्यग्रहणासाठी 5 उपाय
- सूर्यग्रहण काळात गहू, गूळ आणि तांबे दान करणे शुभ मानले जाते. पती किंवा पत्नीपैकी एकाने सूर्यग्रहणाच्या आधी आणि नंतर गुळ खाणे टाळावे.
- हिंदू धर्मात दानाचे महत्त्व सांगितले आहे, सूर्यग्रहणानंतर अपंग/अशक्त व्यक्तीला मदत करा. नियमित आईचा आशीर्वाद घ्या आणि तांदूळ आणि दूध दान करा.
- सूर्यग्रहणानंतर रोज हनुमान चालिसाचा पाठ करा. मांस आणि मद्य यांपासून दूर राहा आणि आपले आचरण शुद्ध ठेवा.
- जर तुमच्या घराभोवती पिंपळाचे झाड असेल तर त्याला रोज पाणी द्या आणि त्याची सेवा करा.
- सूर्यग्रहणाचा प्रभाव कमी करण्यासाठी कुटुंबातील सगळ्यांच्याकडून नाण्यांच्या रूपात पैसे घ्या आणि एखाद्या दिवशी संपूर्ण पैसे मंदिरात दान करा.
हे वाचा - सूर्यग्रहण, चंद्रग्रहण का होतात? समुद्रमंथनाशी संबंधित कथेत सांगितलेय अनोखी घटना ज्योतिषशास्त्रानुसार हे देखील करता येते - 1. आदित्यहृदय स्तोत्राचा नियमित पाठ करा 2. सूर्याला जल अर्पण करा म्हणजेच अर्घ्य द्या. 3. एकादशी आणि रविवारी उपवास ठेवा. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)