मुंबई, 27 जानेवारी : रामभक्त हनुमान हे कलियुगातील जागृत देवता मानले जातात. हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण केले जाते. हा पाठ विशेषत: मंगळवार आणि शनिवारी करावा. जर तुम्हाला वेळ असेल तर दररोज आंघोळीनंतर हनुमान चालिसाचा पाठ करणे लाभदायी ठरेल. पाठ सुरू करण्यापूर्वी, वीर बजरंगबलीची पूजा करा आणि त्यांना आवडीचा नैवेद्य अर्पण करा. हनुमान चालिसाचे पठण केल्याने भय, दुःख, त्रास इत्यादी दूर होतात. हनुमान त्रास निवारक मानले जातात. ते समस्या संपवतात, मग त्या समस्या त्याच्या प्रभू रामाच्या असोत किंवा भक्तांच्या असोत.
तिरुपतीचे ज्योतिषाचार्य डॉ. कृष्णकुमार भार्गव म्हणतात की, हनुमान हा श्रीरामाचा भक्त आहे, ज्यांना प्रभू रामाची कृपा मिळवायची आहे, त्यांना हनुमान मदत करू शकतात. हनुमान हा श्रीराम मिळवण्याचा मार्ग आहे. रामाला प्रसन्न करून त्याची कृपा मिळू शकते. हनुमान चालिसामध्ये माणसाच्या अनेक दुःखांवर उपाय सांगितला आहे. जाणून घेऊया हनुमान चालिसाचे फायदे.
1. संकट कटे मिटै सब पीरा। जो सुमिरै हनुमत बलबीरा।।
जो व्यक्ती खऱ्या मनाने हनुमान चालिसाचा पाठ करतो, हनुमानजी त्याच्या सर्व संकटांचा नाश करतात. हनुमताच्या कृपेने जीवनात कोणतेही संकट तुम्हाला त्रास देऊ शकत नाही.
2. बल, बुद्धि, विद्या देहु मोहि। हरहु कलेश विकार।।
हनुमान चालीसाचे पठण करणार्यांना हनुमान केवळ शक्ती, बुद्धी आणि ज्ञान प्रदान करत नाही तर त्यांचे दुःख देखील दूर करतात.
3. भूत पिशाच निकट नहीं आवे। महावीर जब नाम सुनावे।।
हनुमान हा सकारात्मकतेचे प्रतीक आहे, त्याच्यामध्ये अफाट शक्ती आहे, तो अतुलनीय सामर्थ्यवान आहे. जो व्यक्ती सतत हनुमान चालिसाचे पाठ करतो, त्याला नकारात्मक शक्ती त्रास देऊ शकत नाहीत. त्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही.
4. नासै रोग हरै सब पीरा। जपत निरंतर हनुमत बीरा।।
एवढेच नाही तर जो खऱ्या मनाने शूर पवनपुत्र हनुमानाची उपासना करतो, त्याला हनुमान विविध रोगांपासूनही वाचवतो. त्यांच्या भक्ताची प्रकृती उत्तम राहते. सर्व प्रकारच्या शारीरिक वेदना दूर होतात.
5. जो सत बार पाठ कर कोई। छूट ही बंदी महा सुख होई।।
जो मनुष्य हनुमान चालिसाचा शंभर वेळा पाठ करतो, त्याला सर्व प्रकारच्या बंधनांपासून मुक्त होऊन परम सुख प्राप्त होते. वीर हनुमान त्याला आशीर्वाद देतात.
6. आत्मविश्वास आणि ताकद वाढते
ज्या व्यक्तीचे मनोबल कमकुवत आहे, आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती कमी आहे, त्यांनी हनुमान चालिसाचा पाठ करावा. शूरवीर बजरंगबलीच्या कृपेने आत्मविश्वास आणि शौर्य वाढते. भीती निघून जाते.
हे वाचा - 28 तारखेला आहे रथसप्तमी, सूर्याचं बल-तेज कायम पाठीशी राहण्यासाठी अशी करा पूजा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hanuman, Hanuman mandir, Religion