पुणे, 16 ऑगस्ट: ऑगस्ट महिन्यात सुरुवातीला दोन आठवडे दडी मारल्यानंतर आता राज्यात मान्सूनसाठी (Monsoon In Maharashtra) पोषक हवामान तयार झालं आहे. मागील तीन चार दिवसांपासून राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी (Rain in Maharashtra) कोसळल्या आहेत. आज कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची (Heavy Rainfall) शक्यता वर्तवण्यात आली आहे. हीच स्थिती पुढील तीन दिवस राहणार असल्याची माहिती मुंबई वेधशाळेकडून देण्यात आली आहे. आज राज्यात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी येलो अर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीनं पाऊस कोसळणार आहे. मागील जवळपास तीन आठवड्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. हीच स्थिती पुढील तीन दिवस कायम राहणार आहे. मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहणार आहे.
Good News for Farmers in Maharashtra
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 16, 2021
16 Aug, IMD मुंबई व नागपूर द्वारा जारी केलेल्या हवामानाच्या इशाऱ्या नुसार,राज्यात पुढचेे ३ दिवस मुसळधार पाऊस असण्याची शक्यता.खास करून मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात जोर जास्त असण्याची शक्यता
अधिक माहिती साठी IMDची वेबसाइट कृपया पहा pic.twitter.com/5a4hk6rp1L
हेही वाचा- पुणेकरांची चिंता वाढली; ग्रामीणपाठोपाठ आता शहरातही Delta Plusचा शिरकाव कुलाबा वेधशाळेच्या शुभांगी भुत्ते यांनी सांगितलं की, राज्यात पुढील तीन ते चार दिवस कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. याचाच एक भाग म्हणून पुढील तीन चार दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहेत. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ही भुत्ते यांनी वर्तवली आहे. हेही वाचा- कोरोना Delta Variant चं थैमान सुरू; सोमवार ठरला भयंकर! बुधवारी पुण्यासह सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि यवतमाळ या सात जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहेत. तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. मागील काही दिवसांपासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची आस लागली होती. त्यानंतर आता राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झालं असून शेतकऱ्यांच्या चिंता दूर झाल्या आहेत.

)







