बारामती, 04 मार्च : 'पदवीधर आणि कसबा निवडणुकीत दिसून आले पुण्याच्या निवडणुकीबाबत मी काही सांगण्याची गरज नाही, ते जगजाहीर आहे. त्यामुळे आता निष्कर्ष काढणे योग्य नाही, मला जी माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये देशाचे चित्र बदलत आहे' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पोटनिवडणुकीवर शरद पवारांनी भाष्य केलं.
कसबा पोटनिवडणुकीमधील मी माहिती घेतली त्याच्यामध्ये दोन ठिकाणी अधिक मते मिळाली आहेत. हा बदल आहे, तो पुण्यात होत आहे याचा अर्थ लोक वेगळ्या विचाराच्या प्रक्रियेत आहेत, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
भाजप आणि निवडणूक पूरक वातावरण
मला वाटत आहे की, बदलाचे वातावरण तयार होताना दिसत आहे. सध्या झालेल्या पदवीधर निवडणुका आणि इतर निवडणुकांमध्ये जवळपास सगळीकडे भाजपला एखादी जागा सोडली तर एक सुद्धा जागा मिळू शकली नाही. सरकार त्यांचं सत्तेच्या वापर त्यांचा हे या निवडणुकीत दिसून आले आहे. पुण्याच्या निवडणुकीबाबत मी काही सांगण्याची गरज नाही, ते जगजाहीर आहे त्यामुळे आता निष्कर्ष काढणे योग्य नाही, मला जी माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये देशाचे चित्र बदलत आहे, असं शरद पवार म्हणाले.
निवडणूक आयोगासाठी कोर्टाचा निर्णय
सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला निवडणूक आयोगाच्या संबंधीच्या ज्या शंका आमच्या सहकाऱ्यांनी उभ्या केल्या होत्या. त्या निवडणूक आयोगाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल केला. त्याच्यामध्ये नियुक्ती करताना सरन्यायाधीश आहेत, प्रधानमंत्री आहेत आणि मुख्य म्हणजे विरोधी पक्ष नेता ही याच्यामध्ये यावा या सर्वांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले आणि हे आणि हे लोकशाही मधील चांगला निर्णय आहे चांगला निर्णय आहे, असं म्हणत पवारांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं.
नागालँड निवडणूक निकाल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँडमध्ये 12 जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये दोन क्रमांकाची मते घेणारा पक्ष ठरला आहे. सत्ताधारी पक्ष आहे, त्यांच्या सरकारमध्ये मान्यता प्राप्त विरोधी पक्ष हे राष्ट्रवादीच्या व्यक्तीकडे आहे. आमच्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी वाधवान यांना नागालँड मध्ये पाठवले आहे. तिथे काय करावं यासंबंधीची माहिती आणि त्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ मी नागालँड च्या जनतेचा आभारी आहे, असंही पवार म्हणाले.
कांदा बाजार भाव
'मी दोन दिवसापूर्वी नाशिक आणि नगरच्या दौऱ्यावर होतो यावेळी मला शेतकऱ्यांनी कांदा फेकून दिल्याची माहिती दिली काही ठिकाणी कांदा फेकून दिल्याने अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंबंधीचा राज्य सरकार आणि केंद्र सरकार निर्णय घेत नाही. आम्ही सत्तेत असताना देखील कांद्याच्या बाजारभावाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी सरकारने आणि नाफेडने कांदा खरेदी केला आणि त्याच्यातून अधिकचा आर्थिक बोजा उचलला सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार याबाबत अपयशी ठरले आहे, अशी टीकाही पवारांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.