जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Mumbai Pune Expressway : पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर पुन्हा दरड कोसळली; चार दिवसात तिसरी घटना; वाहतूक विस्कळीत

Mumbai Pune Expressway : पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर पुन्हा दरड कोसळली; चार दिवसात तिसरी घटना; वाहतूक विस्कळीत

पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर पुन्हा दरड कोसळली

पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर पुन्हा दरड कोसळली

Mumbai Pune Expressway : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पुन्हा दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

गणेश दुडम, प्रतिनिधी पुणे, 27 जुलै : पुणे मुंबई एक्सप्रेस महामार्गावर पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. विशेष म्हणजे आज (27 जुलै) 2 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. 12 ते 2 या वेळेत सैल झालेल्या दरडी हटवण्यात आल्या. मात्र, गेल्या दोनचार दिवसांपासून पुणे मुंबई महामार्गावर अधूनमधून वाहतूक विस्कळीत होत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काय घडली घटना? पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मातीचा ढिगारा कोसळला आहे. कामशेत बोगद्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरच ही घटना घडली आहे. पावणे नऊ वाजता घडलेल्या घटनेनंतर एका लेनवरून वाहतूक सुरू आहे. काहीवेळात मातीचा हा ढिगारा बाजूला घेतल्यावर उर्वरित दोन लेन ही सुरू केल्या जातील. रविवारी रात्री साडे दहा वाजता दरडीची पहिली घटना घडली ती मुंबई मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ तर दुसरी दरड त्याच मद्यरात्री तीन वाजता लोणावळ्याजवळ कोसळली होती. चार दिवसानंतर ही तिसरी घटना घडलेली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, वाहतूक ही सुरळीत आहे. दरड कोसळण्याच्या घटना सुरुच याआधी रविवारी रात्री पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर डोशी बोगद्याजवळ किलोमीटर 41 जवळ दरड कोसळली होती, त्यामुळे पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या तीन लेन बंद करण्यात आल्या. तर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. मागचा आठवडाभर मावळ भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे, त्यामुळे दरड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे, यामुळे गुरूवारी सैर झालेल्या दरडी हटवण्याचं काम करण्यात येणार आहे. वाचा - पुणे- नाशिक महामार्गावर विचित्र अपघात; चालकाला खेचून बाहेर काढलं, वाहतूक कोंडी दुसरीकडे गुरूवारी मुंबईमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे, त्यामुळे मुंबईतल्या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तसंच रेड अलर्टमुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे. मुंबईसह कोकण आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाने धुडगूस घातला आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबई महानगराला 26 जुलै रात्री 8 ते उद्या 27 जुलै दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. रत्नागिरीमध्येही रेड अलर्ट असल्यामुळे शाळांना सुट्टी द्यायचा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात