
यशस्वी जैसवाल हा भारताला सापडलेला नवा हिरा आहे, असं म्हटलं जात आहे. Under-19 World Cup वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानविरोधात त्याने धडाकेबाज शतक ठोकलं.

यशस्वीनं केले अनेक महान पराक्रम केले आहेत. यशस्वी दुहेरी शतक करणारा तो जगातला सर्वात लहान खेळाडू ठरला आहे. याशिवाय विजय ट्रॉफीमध्ये एका सामन्यातील पहिल्या डावात सर्वात जास्त 12 षटकार लगावण्याची कामगिरी त्यानं केली आहे.

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी झालेल्या लिलावात यशस्वीवर सर्वाधिक बोली लागली होती. भारताचा अंडर-19 कर्णधार प्रियम गर्गला हैदराबाद संघानं 1.90 कोटींना विकत घेतलं, तर मुंबईकर यशस्वी जयस्वालला राजस्थान रॉयल्स संघानं 2.40 कोटींना विकत घेतलं.

श्रीलंका दौऱ्यावर पाच एकदिवसीय सामने खेळायला जाणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय खेळाडूंमध्ये त्याचा पहिल्यांदा समावेश झाला. आयुष्याचा संघर्ष वाचून तुमचं मन नक्कच हेलावून जाईल. यशस्वी आधी आझाद मैदानात पाणीपुरी विकायचा.

वयाच्या ११ व्या वर्षी उत्तर प्रदेशमधील भदोही इथून क्रिकेटर व्हायचे स्वप्न उराशी बाळगून मायानगरी मुंबईत आला. यशस्वीचे काका वरळी येथे राहतात पण त्यांचे घर छोटे असल्याचे सांगून त्यांनी यशस्वीची सोय आझाद मैदान येथील मुस्लिम युनायटेड क्लबमध्ये केली.

मात्र यशस्वीच्या मते, दिवसभर क्रिकेट खेळल्यामुळे रात्री तो डेरीमध्येच झोपायचा. त्यांच्या कोणत्याच कामात मदत होत नसल्यामुळे त्यांनी एक दिवस त्याचं संपूर्ण सामान डेरीच्या बाहेर फेकून दिलं. अखेर तो राहण्याची सोय हवी म्हणून आझाद मैदान येथील मुस्लिम युनायटेड क्लबमध्ये आला.

तिथे तो पाणी- पूरी आणि फळं विकून स्वतःचा उदरनिर्वाह करायचा. यादरम्यान, त्याच्या मित्रांनी कधीच तिकडे पाणी- पुरी खायला येऊ नये असं त्याला वाटायचं. अगदी आलेच तर त्यांना चांगली पाणी- पुरी देऊ नये असंही वाटायचं.

यशस्वीच्या आयुष्यात असेही दिवस आले जेव्हा तो उपाशी पोटी झोपायचा. तसेच तो जिथे राहायचा तिथे बाथरूमची सोय नसल्यामुळे तो फॅशन स्ट्रीटला बाथरूमसाठी जायचा.

अनेकदा मेणबत्तीच्या प्रकाशात तो जेवायचा. अनेक रात्री त्याला घरच्यांची आठवण यायची आणि तो ओक्शाबोक्शी रडायचा. पण काहीही झालं तरी रिकाम्या हाती घरी जायचं नाही असंच त्याने ठरवलं होतं.

१९ वर्षांखालील टीम इंडियाचे प्रशिक्षक सतीश सामंत यांनी यशस्वीबद्दल सांगितले की, ‘यशस्वीला एक खेळआडू म्हणून घडवण्याचं श्रेय त्याचे प्रशिक्षक ज्वाला सिंह यांना जाते. ज्वाला यांनी पहिल्यांदा यशस्वीला आझाद मैदान इथे खेळताना पाहिले.

२०११ मध्ये ज्वाला यांनी आपली क्रिकेट अकादमी सुरू केली. स्वतः सिंहही क्रिकेटर होण्यासाठी मुंबईत आले होते. ज्वाला यांना जास्तीत जास्त मुलांची स्वप्न पूर्ण करायची आहेत. यशस्वीचा संघर्ष पाहून ज्वाला यांनी त्याची मदत करण्याचा निर्णय घेतला.’

यशस्वी आणि त्याचे कुटुंब ज्वाला सिंह यांचे कौतुक करत थकत नाही. १९ वर्षांखालील संघात निवड झाल्यानंतर यशस्वीला परफॉर्मन्सच्या तणावाबद्दल विचारले असता तो म्हणाला की, ‘माझ्यावर कोणताही दबाव नाही. मला लहानपणापासून तणाव सहन करण्याची सवय आहे.

मला माहीत आहे मी धावा करु शकतो आणि गडीही बाद करू शकतो. एकदा माझ्या मित्रांनी दुपारच्या जेवणाला त्यांच्यासोबत यायला सांगितले. पण माझ्याकडे काहीच पैसे नव्हते. मग त्यांच्यासोबत कसं जायचं या विचारानेच मला शरमल्यासारखं झालं. तेव्हा मी त्यांना म्हणायचो की, माझ्याकडे पैसे नाहीत पण भूक आहे.’




