ऑस्ट्रेलियाने फिरकीपटूंच्या जोरावर भारताला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. नाथन लायनने ५ विकेट घेतल्या. पहिल्या डावात ९ विकेट फिरकीपटूंना मिळाल्या. दिल्लीच्या मैदानात याआधी झालेल्या पाच कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी सर्वाधिक १० विकेट गेल्या आहेत. तर तिसऱ्या दिवशी ८ आणि चौथ्या दिवशी सर्वात कमी ६ विकेट पडल्या आहेत. त्यामुळे आता भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव लवकर गुंडाळावा लागेल.