महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. ही संचारबंदी 14 एप्रिल 2021 रात्रीपासून सुरू झाली आहे. अशावेळी नागरिकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा सरकारकडून व्यक्त केली जात आहे, मात्र रेमडिसिव्हीरचा काळाबाजार, ऑक्सिजनचा तुटवडा, बेड्स उपलब्ध नसणे इ. सर्व समस्यांमुळे नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळतो आहे. सरकार यावर काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.