सहरसा, असं म्हणतात की देशाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये गेलात तरी तुम्हाला इथले रिक्षा चालक ते प्रशासकीय अधिकारी सापडतील. प्रत्येक वर्षी युपीएससी परीक्षा पास करणाऱ्यांमध्ये बिहारचे सर्वाधिक विद्यार्थी असतात. बिहारच्या सहरसा जिल्ह्यात एक गाव असं आहे, ज्याला आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांचं गाव म्हणूनही ओळखलं जातं. या गावाचं नाव आहे बनगाव.