'कोरोना'शी लढ्याचं 'केरळ मॉडेल', भारतातील पहिले 3 रुग्ण असे झाले व्हायरसमुक्त
केंद्र सरकारने कोरोनाव्हायरसवरील (Coronavirus) उपचारासाठी अँटी HIV औषधं वापरण्यास परवानगी दिली, मात्र केरळमध्ये (Kerala) पॅरासमिटामोल, आयसोलेशन आणि काऊन्सलिंगद्वारे उपचार केले जात आहेत.


एकिकडे विकसित देशांमध्ये कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू होत आहेत, मात्र भारत कोरोनावर यशस्वी उपचार करताना दिसत आहे. देशात पहिले 3 रुग्ण आढळून आले आणि तिघंही केरळातील होतो. चीनहून हे रुग्ण भारतात परतले होते.


केरळात सर्वात आधी या रुग्णांना वेगळं ठेवण्यात आलं आणि हे खूपच कठीण होतं. कारण रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यासाठी तयार होत नाही. त्यासाठी या रुग्णांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं काऊन्सिलंग करण्यात आलं. विशेषत जेव्हा रुग्णालयाच्या एका वेगळ्या खोलीत पूर्णपणे आयसोलेशनमध्य ठेवलं जातं.


फक्त केरळात 3 रुग्ण आढळून आले, त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात ठेवण्यात आलं. एक रुग्ण थ्रिसुर (Thrissur), दुसरा आलप्पुझा (Alappuzha) आणि तिसरा कासरगोड (Kasaragod) रुग्णालयात होता. जेणेकरून प्रत्येक रुग्णावर पूर्ण लक्ष ठेवता येईल.


यानंतर चीनहून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आलं. सर्वात आधी त्यांची रक्तचाचणी करण्यात आली. रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यानंतरही त्यांना रुग्णालयात 72 तासांसाठी देखरेखीत ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांना घरीदेखील 24 तास आइसोलेशनमध्ये ठेवलं.


इंटरनेटमुळे प्रत्येक माहिती मिळत असल्यामुळे हे जास्त भीती निर्माण होऊ नये, यासाठी रुग्णालयात जनजागृती करण्यात आली, शिवाय समुपदेशनही देण्यात आलं.


द प्रिंटला दिलेल्या एका मुलाखतीत केरळच्या anti-nCoV task force चे इन्चार्ज डॉं अमर फेटले यांनी सांगितलं की, तिन्ही रुग्णांमध्ये कोरोनाव्हायरसची सौम्य लक्षणं होती, त्यामुळे आम्ही त्यांना पॅरासिटामोल आणि अशी औषधं दिली ज्यामुळे त्यांच्यामधली ही लक्षणं कमी होतील. यामध्ये सर्दी-खोकल्याची औषधंही होती.


Drug Controller General of India ने कोरोनावरील उपचारासाठी Anti HIV औषधांचा वापर करण्याचा सल्ला दिला होता, मात्र केरळमधील डॉक्टरांनी या औषधांचा वापर केला नाही. डॉ. फेटले यांनी सांगितल्यानुसार, या औषधांऐवजी आम्ही रुग्णाच्या समुपदेशनावर भर दिला. जेणेकरून ते घाबरणार नाहीत आणि त्यांचं शरीरा औषधांना प्रतिसाद देईल.


तिन्ही रुग्ण बरे झाल्यानंतर आणि त्यानंतर कोरोनाव्हायरसचं कोणतंही नवीन प्रकरण सापडलं नाही, तेव्हा केरळ सरकारने राज्य आपत्तीची घोषणा रद्द केली. मात्र तरीही योग्य ती खबरदारी घेतली जाते आहे.


केरळच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 2 हजारपेक्षा जास्त लोकांना वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आलं आहे. त्यापैकी काही रुग्णालयात तर काही घरी आहेत.


जगभरात कोरोनाव्हायरसचे एकूण90,932 प्रकरणं आहेत. ज्यापैकी 3,119 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्त ७० देशांमध्ये भारताचा समावेश आहे. फक्त केरळात ३ रुग्ण आढळले आणि तिन्ही रुग्ण बरे झाले. उपचारानंतर कोरोनामुक्त झाले.