ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करताना एटीएम फ्रॉड होण्याची शक्यता देखील असते. ग्राहकांचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. सणासुदीच्या काळात जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा ग्राहकांनी या 5 चुका टाळणे अत्यंत आवश्यक आहे. जाणून घ्या एसबीआयने कोणत्या 5 चुकांबाबत त्यांच्या ग्राहकांना सावधान केले आहे.
1. कुणाबरोबरही शेअर करू नका OTP, PIN, CVV आणि UPI PIN- बँक ट्रान्झॅक्शन करताना तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी, पिन क्रमांक त्याचप्रमाणे तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डवरील सीव्हीव्ही कुणाशीही शेअर करू नका. अधिकतर फसवणुकीचे प्रकार फोन कॉल द्वारे ओटीपी किंवी सीव्हीव्ही दिल्यामुळे झाले आहेत. तुम्ही असे केल्यास त्वरीत बँकेशी संपर्क करा.
2. बँकेशी संबंधित माहिती फोनमध्ये सेव्ह करणे टाळा- तुमच्या बँक खात्या संबंधित माहिती फोनमध्ये सेव्ह करणे टाळा. एसबीआयच्या मते, तुमचा बँक खाते क्रमांक,पासवर्ड, एटीएम कार्ड नंबर किंवा त्याचा फोटो फोनमध्ये सेव्ह करण्यामध्ये जोखीम आहे. डिजिटल चोरी करणारे याचा वापर करून तुमच्या खात्यावर डल्ला मारू शकतात.
5. बँकेकडून ही माहिती कधीही विचारली जात नाही- संवेदनशील माहिती जसे की, युजर आयडी, पिन, पासवर्ड, सीव्हीव्ही, ओटीपी, व्हीपीए (UPI) कधीही बँकेच्या प्रतिनिधींकडून विचारली जात नाही. त्यामुळे अशी माहिती घेण्यासाठी कुणाचा फोन आलाच तर तो नंबर ब्लॉक करा, त्यावर कोणतीही माहिती देऊ नका. हा कॉल फिशिंगचा असू शकतो.