तुम्ही एटीएममध्ये पैसे काढायला जाता. काही तांत्रिक बिघाडामुळे पैसे निघत नाही. पण बँक अकाऊंटमधून कापले जातात. मग तुम्ही केअर सेंटरला फोन करता. बँकेत खेटे मारता.
RBIच्या नियमाप्रमाणे बँकेला 7 दिवसांत ग्राहकांना पैसे परत द्यावे लागतात. तसं नाही झालं तर बँकेला ग्राहकांना दंड द्यावा लागतो.
तुम्हाला तक्रार दाखल करताना ट्रॅन्झॅक्शन रिसिट किंवा अकाऊंट स्टेटमेंट जोडावं लागेल. तुम्हाला एक फाॅर्मही भरावा लागेल. जेव्हा तुम्ही हा फाॅर्म भराल तेव्हापासून पेनल्टी सुरू होईल.