advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Ahmadnagar News: प्रयोगशील शेतकऱ्याची कमाल, चक्क अहमदनगरमध्ये पिकवलं सफरचंद, पाहा Photos

Ahmadnagar News: प्रयोगशील शेतकऱ्याची कमाल, चक्क अहमदनगरमध्ये पिकवलं सफरचंद, पाहा Photos

अहमदनगरमधील प्रगतशील शेतकरी भारत गुंजाळ आपल्या शेतात विविध प्रयोग करत असतात. त्यांनी हिमालयातील सफरचंद आपल्या शेतात पिकवले आहेत.

  • -MIN READ

01
कृषी प्रधान असणाऱ्या भारतात भौगोलिक रचना, हवामान यानुसार पीक पद्धती वेगवेगळी आहे. परंतु, आधुनिक पद्धतीने काही शेतकरी थंड प्रदेशातील पिकेही दुष्काळी भागात घेऊ लागले आहेत.

कृषी प्रधान असणाऱ्या भारतात भौगोलिक रचना, हवामान यानुसार पीक पद्धती वेगवेगळी आहे. परंतु, आधुनिक पद्धतीने काही शेतकरी थंड प्रदेशातील पिकेही दुष्काळी भागात घेऊ लागले आहेत.

advertisement
02
 प्रगतशील शेतकरी भारत गुंजाळ यांनी असाच एक प्रयोग केला आहे. नेवासा तालुक्यातील रामडोह या गावात चक्क हिमालयातील सफरचंदाची शेती केली आहे.

अहमदनगरमधील प्रगतशील शेतकरी भारत गुंजाळ यांनी असाच एक प्रयोग केला आहे. नेवासा तालुक्यातील रामडोह या गावात चक्क हिमालयातील सफरचंदाची शेती केली आहे.

advertisement
03
भारत गुंजाळ यांनी सफरचंदाची रोपे हिमाचल प्रदेश मधून मागवली आहेत. रोपे आणण्यासाठी त्यांना प्रति रोप 125 रुपये एवढा खर्च आला.

भारत गुंजाळ यांनी सफरचंदाची रोपे हिमाचल प्रदेश मधून मागवली आहेत. रोपे आणण्यासाठी त्यांना प्रति रोप 125 रुपये एवढा खर्च आला.

advertisement
04
एक एकर जमिनीत त्यांनी सफरचंदाची लागवड केली. शेतात 375 सफरचंदाची रोपे लावली आहेत.

एक एकर जमिनीत त्यांनी सफरचंदाची लागवड केली. शेतात 375 सफरचंदाची रोपे लावली आहेत.

advertisement
05
लागवडीनंतर साधारण अडीच ते तीन वर्षांच्या कालावधीमध्ये संफरचंदाच्या झाडांना फळे लागली आहेत. सध्या एका झाडाला 70 ते 75 फळे आले आहेत.

लागवडीनंतर साधारण अडीच ते तीन वर्षांच्या कालावधीमध्ये संफरचंदाच्या झाडांना फळे लागली आहेत. सध्या एका झाडाला 70 ते 75 फळे आले आहेत.

advertisement
06
 बदलत्या काळानुसार सफरचंदाचे काही वाण हे 50 डिग्री सेल्सियसपर्यंतच्या तापमानातही जगू शकतात. आता उन्ह आणि पक्षांनी फळाचे नुकसान करू नये म्हणून फळांना प्लास्टिक आच्छादन करण्याचे काम सुरू आहे.

बदलत्या काळानुसार सफरचंदाचे काही वाण हे 50 डिग्री सेल्सियसपर्यंतच्या तापमानातही जगू शकतात. आता उन्ह आणि पक्षांनी फळाचे नुकसान करू नये म्हणून फळांना प्लास्टिक आच्छादन करण्याचे काम सुरू आहे.

advertisement
07
सफरचंदाची लागवड करण्यासाठी सरासरी तापमान 21 ते 24 अंश असणे गरजेचे आहे. या पिकाला चांगली फुले आणि फळ धारणा होण्यासाठी सुमारे 100 ते 125 सेंटीमीटर पर्जन्यमान असणे आवश्यक आहे.

सफरचंदाची लागवड करण्यासाठी सरासरी तापमान 21 ते 24 अंश असणे गरजेचे आहे. या पिकाला चांगली फुले आणि फळ धारणा होण्यासाठी सुमारे 100 ते 125 सेंटीमीटर पर्जन्यमान असणे आवश्यक आहे.

advertisement
08
अहमदनगरमधील ज्या भागात हे पीक घेतले जात आहे, तिथे वातावरण काही अंशी थंडच जाणवते. जायकवाडीच्या बॅक वॉटर हा पट्टा असल्याने वातावरणात गारवा असतो. येथील तापमान कमीत कमी 15° आणि जास्तीत जास्त 30° आहे.

अहमदनगरमधील ज्या भागात हे पीक घेतले जात आहे, तिथे वातावरण काही अंशी थंडच जाणवते. जायकवाडीच्या बॅक वॉटर हा पट्टा असल्याने वातावरणात गारवा असतो. येथील तापमान कमीत कमी 15° आणि जास्तीत जास्त 30° आहे.

advertisement
09
भारत गुंजाळ यांनी जोखीम पत्करत आपल्या एक एकर शेत जमिनीत प्रायोगिक तत्त्वावर सफरचंद शेती सुरू केली. जायकवाडीच्या कुशीत वसलेल्या रामडोह येथे सफरचंद लागवड शक्य असल्याचे या प्रयोगातून समोर आले आहे.

भारत गुंजाळ यांनी जोखीम पत्करत आपल्या एक एकर शेत जमिनीत प्रायोगिक तत्त्वावर सफरचंद शेती सुरू केली. जायकवाडीच्या कुशीत वसलेल्या रामडोह येथे सफरचंद लागवड शक्य असल्याचे या प्रयोगातून समोर आले आहे.

advertisement
10
आता गुंजाळ यांचा सफरचंदाच्या शेतीचा नवखा प्रयोग सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरत आहे.

आता गुंजाळ यांचा सफरचंदाच्या शेतीचा नवखा प्रयोग सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरत आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • कृषी प्रधान असणाऱ्या भारतात भौगोलिक रचना, हवामान यानुसार पीक पद्धती वेगवेगळी आहे. परंतु, आधुनिक पद्धतीने काही शेतकरी थंड प्रदेशातील पिकेही दुष्काळी भागात घेऊ लागले आहेत.
    10

    Ahmadnagar News: प्रयोगशील शेतकऱ्याची कमाल, चक्क अहमदनगरमध्ये पिकवलं सफरचंद, पाहा Photos

    कृषी प्रधान असणाऱ्या भारतात भौगोलिक रचना, हवामान यानुसार पीक पद्धती वेगवेगळी आहे. परंतु, आधुनिक पद्धतीने काही शेतकरी थंड प्रदेशातील पिकेही दुष्काळी भागात घेऊ लागले आहेत.

    MORE
    GALLERIES