मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील काही तालुक्यात उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होते. मुंबई शहराला पाणी पुरवठा ज्या जलाशयांमधून केला जातो ते ज्या ठिकाणी आहेत तिथल्याच नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
2/ 5
ठाण्यातील शहापूर तालुक्यातल्या फुगाळे गावातील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियाव व्हायरल होत आहेत. यात गावातील लोकांची विहिरीच्या काठावर पाण्यासाठी झुंबड उडाल्याचं दिसतं.
3/ 5
सध्या काही गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र तोही अपुरा असल्यानं टँकर येताच गावातील नागरिकांची विहिरीवर प्रचंड गर्दी होत असल्याचं चित्र आहे.
4/ 5
जानेवारी महिन्यातच या भागात पाणीटंचाई सुरू होते आणि मे महिन्यापर्यंत पाणीटंचाईची तीव्रता वाढत जाते.
5/ 5
शहापूर तालुक्यातील अनेक आदिवासी पाडे आणि गावात उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पडल्या असून लोक टँकर कधी येणार याकडे वाट पाहत बसलेले असतात.