Weather Update: राज्यात हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा; कधी थांबतील कोसळधारा?
IMD ने पुढील 48 तासांसाठी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 8 जिल्हे वगळता राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची (Rain in maharashtra) शक्यता आहे. विजांसह होणारा हा पाऊस आणखी किती दिवस मुक्कामी असेल याविषयी हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
राज्यात 4-5 दिवसांपासून राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy to very heavy rainfall) पावसानं हजेरी लावली आहे.
2/ 10
उद्या जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे सात जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे.
3/ 10
भारतीय हवामान खात्याने आज कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला, परभणी आणि नांदेड हे आठ जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र येलो अलर्ट जारी केला आहे.
4/ 10
पुढील काही तासांत याठिकाणी वेगवान वाऱ्याच्या साथीने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
5/ 10
पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
6/ 10
राज्यात हळुहळू पावसाचा जोर कमी होणार आहे. तर विकेंडला पुन्हा राज्यातून मान्सून गायब होण्याची शक्यता आहे.
7/ 10
नागरिकांना हवामान तज्ज्ञांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच आकाशात विजा चमकत असताना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
8/ 10
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पूर्व राजस्थान आणि लगतच्या मध्य प्रदेशाच्या काही भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे.
9/ 10
येत्या काळात बंगालच्या उपसागरातील चक्रीय वाऱ्याची स्थिती मंदावणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
10/ 10
बंगालच्या परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्रामुळे येत्या 48 तासात तीव्रता कमी होण्याची शक्यता कमी होऊन ते ओडीशा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या दिशेने पुढच्या 3 दिवसात सरकेल.