रायगडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, मोठी दुर्घटना समोर आली आहे.
खालापूर तालुक्यातील इर्सालवाडी या गावात ही दुर्घटना घडली आहे. या वाडीवर दरड कोसळली आहे. मोरबे धरणाच्या बाजूला असलेल्या या वस्तीवर दरड कोसळली.
मुसळधार पाऊस पडत असताना घडलेल्या या घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर, काही नागरिक सुखरूप वाचले आहेत.