रोहित देशपांडे, बीड, 24 जानेवारी : शेती करताना शेतकऱ्यांना खूप मेहनत घ्यावी लागते. अनेकदा पूर्ण मेहनत घेऊनही शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांमुळे पुरेसे उत्पन्न मिळत नाही. कधी पिकांना भावही मिळत नाही. परंतु योग्य नियोजन करुन आणि अभ्यासपूर्ण शेती केल्यास तुम्हाला नफा मिळू शकतो. याचेच एक उदाहरण आपण आज पाहणार आहोत.