राज्यातील अनेक भागात आठवड्याभरात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने प्रचंड नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या या मुद्द्यावरून विधानसभा अधिवेशनही गाजलं. मुख्यमंत्री शिंदेंनी आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नसल्याचं सांगितलं असलं तरी कृषीमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता बीडमध्ये मिलेट दौडच्या कार्यक्रमात सहभागी झाले.